पुणे : शिरूर लोकसभेच्या जागेवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सातत्याने मुंबईची वारी करावी लागत आहे. महायुतीकडून शिरूर लोकसभेची जागा ही अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. मात्र शिवाजीराव आढळराव पाटील इच्छूक असून त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे वारंवार सांगतीले जात आहे. मात्र अजित पवार गटातील नेत्यांचा त्याला कडाडून विरोध आहे. यावरूनच आढळराव पाटलांना सातत्याने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागत आहे. यातच काल आढळराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता, मुख्यमंत्र्यांनी आढळराव पाटलांना मोलाचा सल्ला दिलाय.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की..,
लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र महायुतीतच अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाहीय. यातच शिरूर लोकसभेच्या जागेवरून अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटात चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं तिकीट निश्चित झालं आहे. मात्र महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाहीय.
यातच शिरूर लोकसभेतून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी थंट थोपटले आहे. त्यांच्या उमेदवारीवरून सध्या घमासान सुरू आहे. या राजकीय गोंधळामुळे उमेदवारीचा निर्णय एकनाथ शिंदे घेतलील असे म्हणत त्यांनी नेत्यांवरच आपली भूमिका सोपवली आहे. याच संदर्भात आढळराव पाटलांमध्ये मुंबईत खलबतं केले आहेत.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आढळराव पाटलांमध्ये मुंबईत तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेत शिरूरची जागा कोणासाठी आहे, हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आपले काम सुरूच ठेवा. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी आढळराव पाटलांना दिला. दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटील सक्षम उमेदवार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मात्र त्यांच्या उमेदवारीविषयी वरिष्ठांकडून स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने त्यांचे राजकीय मुल्य घसरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तर दुसरीकडे ते दोन दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र त्यालाही मुहूर्त मिळत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सुर बघायला मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“श्रीरंग बारणेंच्या विरोधात भाजप बंडाच्या पावित्र्यात..”, मावळात महायुतीत मिठाचा खडा ?
हेही वाचा…“आजोबाला अर्धांगवायू, वय वर्षे ६२, पेशाने रिक्षाचालक, येणार तर मोदीच “, भाजप नेत्याचा अनुभव
“तिकीट कापलं, तरीही पक्षावर निष्ठा कायम, मुळीकांची मोहोळांनी घेतली गळाभेट”
हेही वाचा…“मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा..संपुर्ण देशात आचारसंहिता लागू ; निवडणुकीच्या काळात काय करावे , काय करू नये ? वाचा