नवी दिल्ली : केंद्रीय निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. संपुर्ण देशात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची मतमोजणी ही ४ जुन रोजी होणार असून त्याच दिवशी याचा निकाल लागणार आहे. यातच महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. अशी माहिती निवडणुक आयुक्तांनी दिली आहे.
केंद्रीय निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. संपुर्ण देशात लोकसभा निवडणुका या सात टप्प्यात पार पडणार आहे. ५३४ जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकाचा पहिला टप्पा हा १९ एप्रिल असणार आहे. दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातवा आणि अखेरचा टप्पा हा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिलीय.
हेही वाचा….“भाजपच्या मिशन ४५ ला मराठा समाज सुरूंग लावणार,” जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला ‘हा’ इशारा
लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहे. त्यामध्ये मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून २० मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
हेही वाचा..साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट होणार का ? चर्चांना उधाण, तर कार्यकर्ते आक्रमक
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
READ ALSO :
हेही वाचा..लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला ; एकूण सात टप्प्यात मतदान होणार , महाराष्ट्रात कधी ? आयोगाची मोठी घोषणा
हेही वाचाबीडमध्ये शरद पवार धक्कातंत्राचा वापर करणार ; तगडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…“खैरेंसाठी नाही तर ठाकरेंसाठी काम करतोय, दानवेंनी सगळंच सांगितलं,”
हेही वाचाराज्यात आणखी काका-पुण्याचा संघर्ष, “महादेव जानकरांविरोधात पुतण्यानेच दंड थोपडले”