मुंबई : केंद्रीय निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. संपुर्ण देशात लोकसभा निवडणुका या सात टप्प्यात पार पडणार आहे. ५३४ जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकाचा पहिला टप्पा हा १९ एप्रिल असणार आहे. दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातवा आणि अखेरचा टप्पा हा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिलीय.
हेही वाचा..साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट होणार का ? चर्चांना उधाण, तर कार्यकर्ते आक्रमक
यातच निवडणुकीच्या दरम्यान पैसे वाटप सुरू असल्यास १०० मिनिटांत पथक पोहचणार असल्याचा इशारा राजीव कुमार यांनी दिला आहे. कुठे पैसा वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील अॅपवर टाका. तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोहचणार आहे. असेही राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकांबरोबर काही राज्यात विधानसभांच्याही निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये सिक्किम, ओडीसा, अरूणाचल प्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यात विधानसभांचीही निवडणुका होणार आहेत. अरूणाचल प्रदेशमध्ये १६ मार्चला निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ओडीसा राज्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच याची मतमोजणी ही ४ जून रोजी संपुर्ण देशात होणार आहे.
हेही वाचा…महायुतीतच तणावाचे १० लोकसभा मतदारसंघ ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, दिल्लीत होणार अंतिम निर्णय
संपुर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्पा हा १९ एप्रिल असणार आहे. दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे सातवा टप्पा हा १ जून रोजी पार पडणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण ९६.८ कोटी लोक मतदान करणार आहेत. यामध्ये ४९.७ कोटी पुरूष, ४७.१ कोटी महिला तर १९.७४ कोटी तरूण मतदान प्रक्रियात भाग घेणार आहेत. यातच यावेळी जवळपास १.८ कोटी पहिल्यांदाच तरूण मुलं मुली मतदान करणार आहेत. तर जवळपास ८२ लाख मत हे ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक मतदान करणार आहेत. तर देशात साडेदहा लाख पोलिंग बुथ तयार आहेत. महिलांसह तरूण मतदार वर्गातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा..लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला ; एकूण सात टप्प्यात मतदान होणार , महाराष्ट्रात कधी ? आयोगाची मोठी घोषणा
हेही वाचाबीडमध्ये शरद पवार धक्कातंत्राचा वापर करणार ; तगडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…“खैरेंसाठी नाही तर ठाकरेंसाठी काम करतोय, दानवेंनी सगळंच सांगितलं,”
हेही वाचाराज्यात आणखी काका-पुण्याचा संघर्ष, “महादेव जानकरांविरोधात पुतण्यानेच दंड थोपडले”
हेही वाचा….“भाजपच्या मिशन ४५ ला मराठा समाज सुरूंग लावणार,” जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला ‘हा’ इशारा