मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या घोषणा आज केंद्रीय निवडणुक आयोग करण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राज्यात महायुतीचा अजूनही लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला तब्बल १० जागांवर अडला आहे. त्यामुळे तीन पक्षांपैकी कोण किती आणि कोणत्या जागा लढविणार हे निश्चित होऊ शकलेले नाही. आता येत्या दोन तीन दिवसात दिल्लीत याचा अंतिम फैसला होईली, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“रोहिणी खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही”, एकनाथ खडसे काय काय म्हणाले ?
भंडारा-गोंदिया या जागेवरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात तिढा आहे. तर सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटालाही हवा आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाणे आणि रामटेक हे दोन्ही मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघ सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र याठिकाणी भाजपने मागणी केली आहे.
हेही वाचा..“पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नकोच ; माझंही तेच मत ,” शरद पवारानंतर राऊतांची मोरेंनी घेतली भेट
गडचिरोली मतदारसंघाबाबत भाजप आणि राष्ट्र्वादी अजित पवार गटानेही हट्ट धरला आहे. तर उत्तर-पश्चिम मुंबईवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपनेही दावा सांगितला आहे. दक्षिण मुंबईत भाजप-सेना सोबत मनसेही आग्रही असल्याचे दिसून येत आहे. तर औरंगाबादमध्ये शिवसेना शिंदे गटाचा जागा आहे. मात्र याठिकाणी भाजपही आडून बसला आहे. कोल्हापुरवरून शिवसेना आणि भाजपमध्ये भांडणं सुरू आहेत.
दरम्यान, राज्यातील ४८ पैकी १३ जागांवर शिवसेना शिंदे गटाने आग्रह धरला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला सहा पेक्षा कमी जागा नको आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला ३९ जागा येतील. भाजपचे राज्यातील नेते त्यासाठी राजी नाहीत. त्यामुळे आता चेंडू भाजपच्या श्रेष्ठींकडेच्या कोर्टात गेला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…संभाजीनगरमध्ये खैरे-दानवे संघर्ष पेटणार ; लोकसभा उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज
हेही वाचा“फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या, मग पुणेकरांचे मोहोळ उठेल”, धंगेकरांनी मोहोळांना दिला इशारा
हेही वाचा..कॉंग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी
हेही वाचाते तर… ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, शिवसेना शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे जाणार नाहीत
हेही वाचा…“मोदींची ‘ती’ पोस्ट डिलीट करा अन्यथा…”, भाजपने शरद पवार गटाला दिली धमकी