मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणुक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या जागी आता माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने दानवे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अंबादास दानवे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अंबादास दानवे शिंदे गटात गेले तर ठाकरेंना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“पुण्यामध्ये वॉशिंग मशीन नकोच ; माझंही तेच मत ,” शरद पवारानंतर राऊतांची मोरेंनी घेतली भेट
आमच्यात वाद नाही, मतभेद नाहीत असे सांगत ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल, त्याचा एकदिलाने प्रचार करून असे सांगणारे अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळतेय असे समजल्यावर नाराज झाले आहेत. या नाराजीतून दानवे हे एक दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..“शिंदे गटात राजकीय भुकंप, शिंदेंचे १२ आमदार पुन्हा ठाकरेकडे जाणार “?
अंबादास दानवे हे शुक्रवारी सायंकाळच्या विमानाने मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. मात्र अचानक त्यांना मातोश्रीवरून बोलावणे आल्याने ते विमानतळावरूनच माघारी फिरले, दानवे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न स्वत: उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केला असल्याचे समजत आहे. महाविकास आघाडीतील एक बडा नेता येत असल्याचे सुतावाच पक्ष प्रवक्ते संजय शिरसाट यांनी देखील पत्रकार परिषदेत केला होता.
संजय शिरसाट हे विधान दानवे यांना उद्देशून असल्याची चर्चा आहे. दानवेंच्या खैरेंच्या विरोधात उमेदवारी मिळू शकते, असे सुत्रांचे म्हणणे आहे.
READ ALSO :
हेही वाचा“फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या, मग पुणेकरांचे मोहोळ उठेल”, धंगेकरांनी मोहोळांना दिला इशारा
हेही वाचा..कॉंग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी
हेही वाचाते तर… ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, शिवसेना शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे जाणार नाहीत
हेही वाचा…“मोदींची ‘ती’ पोस्ट डिलीट करा अन्यथा…”, भाजपने शरद पवार गटाला दिली धमकी
हेही वाचा…“रोहिणी खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही”, एकनाथ खडसे काय काय म्हणाले ?