मुंबई : राज्यात आज उद्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यातच भाजपने राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प ठेवला आहे. मात्र भाजपच्या या संकल्पाला मनोज जरांगे पाटील सुरूंग लावणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपचा एकही खासदार निवडून येऊ देणार नाही. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
हेही वाचा…ते तर… ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, शिवसेना शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे जाणार नाहीत
बीडच्या वडवाणीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. तसेच येत्या काही वर्षात देवेंद्र फडणवीस यांचा सुपडा साफ केल्याशिवाय मी थांबणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझे नवीन व्हिडीओ काढायला सुरूवात केली आहे. ते व्हिडीओ एडिट करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. असा आरोपही त्यांनी लावला.
हेही वाचा…“मोदींची ‘ती’ पोस्ट डिलीट करा अन्यथा…”, भाजपने शरद पवार गटाला दिली धमकी
मला मराठ्यांपासून लांब करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. माझी पोलिस सुरक्षा कमी करून फडणवीस आणि भाजप मला संपवण्याचा डाव टाकत आहे. मात्र फडणवीस यांनी लक्षात घ्यावं की सहा कोटी मराठा ओलांडून माझ्यापर्यंत यायचं आहे. असा इशाराही त्यांनी दिलाय. ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मी आता थांबणार नाही. मेलो तरी काही हरकत नाही. मात्र आरत्रण घेणारच. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा..साताऱ्यातून उदयनराजेंचा पत्ता कट होणार का ? चर्चांना उधाण, तर कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…महायुतीतच तणावाचे १० लोकसभा मतदारसंघ ; जागावाटपाचा फॉर्म्युला अडला, दिल्लीत होणार अंतिम निर्णय
हेही वाचा…संभाजीनगरमध्ये खैरे-दानवे संघर्ष पेटणार ; लोकसभा उमेदवारीवरून अंबादास दानवे नाराज
हेही वाचा“फक्त उमेदवारी जाहीर होऊ द्या, मग पुणेकरांचे मोहोळ उठेल”, धंगेकरांनी मोहोळांना दिला इशारा
हेही वाचा..कॉंग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी