मुंबई : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची आज निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. संपुर्ण देशात एकूण सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. येत्या १६ जुन रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्याआधी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यावरूनच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केला आहे.
हेही वाचा…राज्यात आणखी काका-पुण्याचा संघर्ष, “महादेव जानकरांविरोधात पुतण्यानेच दंड थोपडले”
लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महापर्वाचा शुभारंभ झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. भाजप आणि एनडीए ची निवडणुकीत उतरण्यासाठी तयारी पुर्ण आहे. सुशासन आणि केलेल्या कामांच्या आधारावर मला पुर्ण विश्वास आहे. देशातील १४० कोटी कुटुंब आणि ९६ कोटी मतदारांचं प्रेम आणि आशिर्वाद आम्हाला सलद तिसऱ्यांदा मिळेल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा….“भाजपच्या मिशन ४५ ला मराठा समाज सुरूंग लावणार,” जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला ‘हा’ इशारा
दरम्यान, केंद्रीय निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. संपुर्ण देशात लोकसभा निवडणुका या सात टप्प्यात पार पडणार आहे. ५३४ जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकाचा पहिला टप्पा हा १९ एप्रिल असणार आहे. दुसरा टप्पा २६ एप्रिल, तिसरा टप्पा ७ मे, चौथा टप्पा १३ मे, पाचवा टप्पा २० मे, सहावा टप्पा २५ मे आणि सातवा आणि अखेरचा टप्पा हा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिलीय.
The biggest festival of democracy is here! EC has announced the 2024 Lok Sabha election dates. We, the BJP-NDA, are fully prepared for elections. We are going to the people on the basis of our track record of good governance and service delivery across sectors.…
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2024
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर
हेही वाचा..लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला ; एकूण सात टप्प्यात मतदान होणार , महाराष्ट्रात कधी ? आयोगाची मोठी घोषणा
हेही वाचाबीडमध्ये शरद पवार धक्कातंत्राचा वापर करणार ; तगडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…“खैरेंसाठी नाही तर ठाकरेंसाठी काम करतोय, दानवेंनी सगळंच सांगितलं,”