मुंबई : इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपाने कोट्यवधी रुपयांचे खंडणी गोळा केली. भाजपचा अजेंडा होता, चंदा दो, धंदा लो, हप्तावसुली, कंत्राट घ्या, लाच द्या, आणि खोट्या कंपनी बनवा व चंदा द्या. परंतु भाजपाची ही खंडणी वसुली उघड झाली आहे. इलेक्टोरल बाँडमधील आणखी माहिती बाहेर येणार आहे. हा सर्व प्रकार पाहता भारतीय जनता पार्टीची आता बाँड जनता पार्टी झाली आहे. असा हल्लाबोल कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपवर केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…बीडमध्ये शरद पवार धक्कातंत्राचा वापर करणार ; तगडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात
भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूरच्या इम्फाळमधून सुरु झाली. १६ राज्य ११० जिल्हे व ६७०० किलोमीटरचे अंतर पार करुन मुंबईत यात्रेचा समारोप झाला. इलेक्टोरल बाँड मधून भाजपाला मिळालेल्या ६००० कोटी रुपयांच्या खंडणीविरोधात न्याय यात्रेच्या ६००० किमीचा सामना असा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसेल. या यात्रेतून पाच न्याय गॅरंटी दिल्या आहेत. युवा न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय व भागिदारी न्याय असे पाच न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसची गॅरंटी व्यक्तिची नाही तर पक्षाची आहे तर मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, सर्वांना आर्थिकदृष्ट्या संपवून टाकण्याची गॅरंटी आहे असा टोलाही मारला.
हेही वाचा…“खैरेंसाठी नाही तर ठाकरेंसाठी काम करतोय, दानवेंनी सगळंच सांगितलं,”
दरम्यान, भारत जोडो न्याय यात्रेतून २५ गॅरंटी दिल्या आहेत, फक्त गॅरंटी नाहीतर वॉरंटी सहित आहेत. मोदींची २०१४ ची गॅरंटी खोटी होती, निवडणूक जुमला होता असे भाजपाने जाहीर सांगून जनतेची फसवणूक केली. भाजपाची गॅरंटी फेकूगिरी व जुमलेबाजी असते पण काँग्रेस सत्तेत आल्यास या सर्व गॅरंटी पूर्ण केल्या जातील. असा विश्वास व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस शिवसेना खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा..संपुर्ण देशात आचारसंहिता लागू ; निवडणुकीच्या काळात काय करावे , काय करू नये ? वाचा
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की..,
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर
हेही वाचा..लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला ; एकूण सात टप्प्यात मतदान होणार , महाराष्ट्रात कधी ? आयोगाची मोठी घोषणा