मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. संपुर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर काही राज्यात पोटनिवडणुका तसेच विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यातच आजपासून संपुर्ण राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचार संहिता नेमकी काय ? याबाबत अधिक माहिती आपल्यास देत आहोत.
हेही वाचा…“खैरेंसाठी नाही तर ठाकरेंसाठी काम करतोय, दानवेंनी सगळंच सांगितलं,”
आचारसंहिता म्हणजे काय? कोणत्याही व्यक्ती, गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार, नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करु नये हे आखून दिलेली नियमावली. या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं.
आदर्श आचारसंहितेचे नियम काय ? मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, मतदारांना लालूच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते. त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामांची घोषणा करता येत नाही.
आचारसंहिता कोण तयार करतं? कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. आचारसंहितेचं मॅन्युएल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येतं. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिता लागू होते.
हेही वाचा…राज्यात आणखी काका-पुण्याचा संघर्ष, “महादेव जानकरांविरोधात पुतण्यानेच दंड थोपडले”
आचारसंहिता का आवश्यक आहे? आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती व्यक्ती किंवा संस्थेच्या मूल्ये आणि तत्त्वे प्रस्थापित करण्यास मदत करते. ती व्यक्ती किंवा संस्थेच्या सदस्यांना त्यांचे वर्तन कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करते. ती व्यक्ती किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेला वाढवण्यास मदत करते.
आचारसंहितेचे फायदे काय आहेत? निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते. निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत प्रचाराच्या पद्धतींवर मर्यादा, मतदान प्रक्रियेचे नियम, मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करते. निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते. आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध लागतो.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभा निवडणुकांची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की..,
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ? वाचा सविस्तर
हेही वाचा..लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला ; एकूण सात टप्प्यात मतदान होणार , महाराष्ट्रात कधी ? आयोगाची मोठी घोषणा
हेही वाचाबीडमध्ये शरद पवार धक्कातंत्राचा वापर करणार ; तगडा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात