मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून आरक्षणावरून विविध समाज आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते देखील आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. यातच आता धनगर समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी नेते सक्रीय झाले आहेत. यातच शिवसेनेच्या बड्या खासदारांनी मोठा दावा केला आहे.
हेही वाचा…“सवयीप्रमाणे इथं पण आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम करताहेत”, त्याप्रकरणावरून भाजपचा रोहित पवारांना टोला
आगामी निवडणुकांपुर्वी देशात दंगली घडू शकतात. असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जातीच्या धर्माच्या आधारावर या दंगली घडतील. असं म्हणत त्यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात आज ज्याप्रकारे वातावरण तयार केलं जात आहे. त्याप्रमाणे देशात आगामी काही काळात घटना घडू शकतात. कारण भाजपला कोणत्याही परिस्थितीत निवडणू जिंकायची आहे. असंही राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…१७ तारखेपासून ‘या’ ओबीसी नेत्याचा अन्नत्याग उपोषण, राज्य सरकारला दिला जोरदार इशारा
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलकांनी आज ठाणे बंदची हाक दिली आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीर्थ यात्रेतच अडकले आहेत. तंत्रमंत्र आणि जादूटोणा यातच त्यांचा वेळ चालला आहे. अशी खोचक टिका संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मी सत्तेसाठी धडपडत नाही, माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“गद्दारी जस्टीफाय करणारे मुश्रीफ, कोणते मुश्रीफ खरे अन् कोणते खोटे ?” शरद पवारांच्या शिलेदारांनी डिवचलं
हेही वाचा…नाशकात शरद पवारांची ताकद वाढली, राज ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आरक्षण कोर्टात का टिकू शकले नाही, याच..,”
हेही वाचा…भारत जोडो.. नव्या भारताची डिस्कव्हरी ! इंदिरेचा नातू आलाय.. आता चिंता नाही