बीड : बीडच्या जाळपोळीच्या घटनामागे मोठ्या शक्तीशाली व्यक्तीचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा जालण्यात पोहचली असता त्यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर आरोप केला आहे. त्यावर आता सत्ताधारी काय प्रत्युत्तर देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्याबद्दल ‘तो’ शब्द वापरल्याने ठाकरे गटाच्या नेत्याला अटक, शिवसैनिक आक्रमक, राऊतांनी केली जोरदार टिका
रोहित पवार म्हणाले की, बीडमध्ये जाळपोळ झाली. त्या जाळपोळीच्या घटनामागे एक मोठ्या शक्तीशाली व्यक्तीचा हात होता. सत्तेत असणाऱ्या व्यक्तीचा हात होता. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न त्याठिकाणी झाला. बीडला जे घडलं ते लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय द्वेषातून आणि राजकीय पोळी भाजपण्याचा प्रयत्न करत असून जानेवारीपासूनच अशा प्रकारे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी वातावरण शांत ठेवणं हे सामान्य हिताचं आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ‘या’ माजी महापौर नेत्याला पोलिसांनी घरातून केली अटक, राजकारण पेटणार
दरम्यान, बीडच्या जाळपोळीच्या घटनामागे राजकीय व्यक्तीचा हात असल्याचा आरोप पहिल्यापासून केला जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक जणांना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु मुख्य आरोपी अजूनही पकडला गेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भुजबळांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून भूमिका मांडावी,” कॅबिनेट मंत्र्यांनी भुजबळांना सुनावलं
हेही वाचा…“शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ?” सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना फक्त दहा लाखांची मदत, सरकारची शहीदांप्रती अनास्था, वडेट्टीवारांची टिका
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी रविंद्र धंगेकर आक्रमक, धंगेकरांचा पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन