पुणे : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी केलीय. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिका केलीय.
हेही वाचा…शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना आवाहन, पत्राद्वारे केली ‘ही’ मोठी मागणी
महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे अतिशय अडचणीत सापडला आहे. अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन उभा करायला हवे. परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची कसलीही काळजी नाही असे स्पष्ट दिसते. पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ उमेदवारासाठी एकनाथ शिंदेंनी तेलंगणाच्या लोकांना घातली साद, म्हणाले..,
दरम्यान, पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, जेव्हा या सरकारमधील नेत्यांची वैयक्तिक कामे असतात तेव्हा विनाविलंब ते दिल्लीला पळतात मग शेतकऱ्यांना जेव्हा गरज आहे. तेव्हा यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ? महाराष्ट्र सरकारने दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत आणली पाहिजे व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना फक्त दहा लाखांची मदत, सरकारची शहीदांप्रती अनास्था, वडेट्टीवारांची टिका
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी रविंद्र धंगेकर आक्रमक, धंगेकरांचा पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्याबद्दल ‘तो’ शब्द वापरल्याने ठाकरे गटाच्या नेत्याला अटक, शिवसैनिक आक्रमक, राऊतांनी केली जोरदार टिका
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ‘या’ माजी महापौर नेत्याला पोलिसांनी घरातून केली अटक, राजकारण पेटणार