ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी हिंदुह्यदय सम्राट म्हणून उल्लेख केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांनी टिका केली होती. एकनाथ शिंदे यांच्यावर टिका करतांना त्यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आज पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून अटक केली आहे. या अटकेच्या विरोधात असंख्य शिवसैनिक भांडूप पोलिस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आहेत. याचसंदर्भात खासदार संजय राऊत देखील भांडूप पोलिस स्टेशनच्या बाहेर असून त्यांनी या अटकेच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“शरद पवार पावसात भिजले हा 2024 साठी शुभ शकुन”, महाराष्ट्राचं चित्र पुन्हा बदलणार का ?
दत्ता दळवी यांनी महाराष्ट्रातील लोकभावना भांडूपमधल्या एका कार्यक्रमात बोलून दाखवल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तसेच त्यांच्यासोबत असलेले गद्दार सम्राट स्वत: ला हिंदुह्यदयसम्राट म्हणून घेतात. त्याच्यावर तमाम हिंदूचा आक्षेप आहे. गद्दार सम्राटाने स्वत: ला हिंदुह्यदयसम्राट म्हणून घेणे हा वीर सावरकर, हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. त्यामुळे खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यासंदर्भात दत्ता दळवी यांनी जोशपुर्ण भाषण केलं.
हेही वाचा…“आंबेडकरांचं नाव नवीन संसद भवनाला देण्यात यावे”, बिचुकलेंची मागणी, कार्यकर्त्यांनी थेट दुग्धाभिषेक घातला
त्या भाषणात आनंद दिघे आज असते या गद्दारांना चापकाने फटके मारले असते. त्यात त्यांनी एक शब्द वापरला की, ते म्हटले भोसडीचे. हा शब्द धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेंच्या तोंडी घातले आहे. तो सेंसर बोर्डाने तो शब्द कापलेला नाही. जर तो शब्द आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे दिग्दर्शक, प्रयोजक, निर्माते, कलाकार यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केला का ? मग तोच शब्द दत्ता दळवी यांनी वापरल्याने त्यांना अटक कशी केली जाऊ शकते ? असा सवालही संजय राऊतांनी केला आहे.
हेही वाचा…“पण तुम्ही डबल इंजिनाची गाडी गाळात घातली”, चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टिका
यातच काही दिवसापुर्वी भांडुप येथे नारायण तातू राणे आला होता. त्यांनी गाढव नाक्याजवळ माझ्याविरोधात जोरदार शिव्या घातल्या होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला . अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता का ? असे अनेक गद्दार गटातील नेते, मंत्री शिव्या घालत आहेत. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. हे सर्व राज्यात अवकाळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर टिका होत असताना लक्ष हटवण्यासाठी दत्ता दळवी यांच्यावर कारवाई करण्यात आली असून आम्ही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत असून त्यांच्या पाठिंशी आहोत. असंही संजय राऊतांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ‘या’ माजी महापौर नेत्याला पोलिसांनी घरातून केली अटक, राजकारण पेटणार
हेही वाचा…शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना आवाहन, पत्राद्वारे केली ‘ही’ मोठी मागणी
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ उमेदवारासाठी एकनाथ शिंदेंनी तेलंगणाच्या लोकांना घातली साद, म्हणाले..,
हेही वाचा…अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडवली दैना, ठाकरे गट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार, यादी आली
हेही वाचा…मावळात पेच वाढला, महायुतीच्या तिन्हीही नेत्यांचा जागेवर दावा, ठाकरे फायदा उचलणार ?