मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने कार्यकर्ता व महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला. मात्र सभेच्या ठिकाणी शरद पवार येताच मुसळधार आला. त्यानंतर शरद पवारांनी पावसातच आपलं भाषण तसचं सुरू ठेवलं. यातच शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना आली. यावरून आता भाजपच्या नेत्याने यावर टिका केलीय, त्यावर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा, महाराष्ट्रात आम्ही निवडणुकांची वाट बघतोय,”
शरद पवार पावसात भिजले तेव्हा राष्ट्रवादीचे दोन शकले झाली आहेत. मात्र आता पुन्हा भिजल्यानंतर राष्ट्रवादी लोणच्या एव्हढी शिल्लक राहणार नाही. अशी टिका भाजपचे नेते आणि मुंबईचे शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. त्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शेलारांना जोरदार टोला हाणला आहे.
हेही वाचा…“मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच,” ‘या’ भाजप नेत्याने रोहित पवारांना डिवचलं
२०१९ मध्ये साताऱ्यात शरद पवार पावसात भिजले त्यामुळे भाजप सरकार सत्तेत येऊ शकली नाही आणि आमचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्यांनी पक्ष फोडला. परवा पवार साहेब ठाण्यामध्ये भिजले हा २०२४ साठी शुभ शकून आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी वाशिम येथे पत्रकारांशी बोलतांना म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“आंबेडकरांचं नाव नवीन संसद भवनाला देण्यात यावे”, बिचुकलेंची मागणी, कार्यकर्त्यांनी थेट दुग्धाभिषेक घातला
हेही वाचा…“पण तुम्ही डबल इंजिनाची गाडी गाळात घातली”, चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…“विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजे”, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला संताप
हेही वाचा…“तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत बोलणार ?” उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला टोला
हेही वाचा…“नुसत फक्त बोलायचं बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना”, राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा