मुंबई : राज्यातील सुमारे १६ ते १७ जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसाने शेतात उभी असलेली पिकं जमीनउद्धवस्त झाली आहेत. यावरून सर्वच नुकसानग्रस्त पिकांचं पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजेत, असा संताप व्यक्त केलाय.
हेही वाचा…“पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरून सुपारी देऊन पाठवलं होतं, मग..,”सत्तेतून का बाहेर पडलो? तटकरेंनी दिलं उत्तर
राज्य सरकारच्या उपाय योजना अपुऱ्या पडत आहेत. सरकार बनवाबनवी करत असल्याचे आता उघड झाले आहे. आता अधिवेशनाची वाट न पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करण्यात यावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात अवकाळी पावसाचा तडखा बसला आहे. सरकार केवळ घोषणा करू नये. मदत करावी. राज्यातील शेतकरी उद्धवस्त करण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केले आहे. विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजे. असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…“ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदलला, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?” राऊतांनी नार्वेकरांना डिवचलं
दरम्यान, राज्यातील सुमारे 16 ते 17 जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली असल्याचे वृत्त आहे; तसेच आणखी पुढचे काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या अवकाळी व गारपीटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले आहे. कृषी, मदत व पुनर्वसन आणि महसूल विभागाच्या वतीने झालेला पाऊस व त्यामुळे झालेले नुकसान याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे.”असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत बोलणार ?” उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला टोला
हेही वाचा…“नुसत फक्त बोलायचं बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना”, राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
हेही वाचा…“भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा, महाराष्ट्रात आम्ही निवडणुकांची वाट बघतोय,”
हेही वाचा…“मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच,” ‘या’ भाजप नेत्याने रोहित पवारांना डिवचलं
हेही वाचा…“मोदींशी महात्मा गांधींशी तुलना, राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला”, म्हणाले..