मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसने त्यावेळी पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले. राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाठिंबा काढून घेतला नसता तर काॅंग्रेस आघाडीचे सरकार आले असते आणि सध्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्ननही सुटला असता. असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यावर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…पक्षाच्या एकनिष्ठ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांनी जाहीर केलं नाव
आम्हाला गाफिल ठेऊन, जागा काढून त्याची माहिती काढून घेतली. आतापर्यंत जेव्हा दोन राष्ट्रीय पक्षाची युती जाहीर होते, तेव्हा युती जाहीर होऊन उमेदवार घोषित होतात. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांना काहींना दिल्लीवरून सुपारी देऊनच राष्ट्रवादीच्या विरोधात काम करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे निवडणुक पुर्व युती होऊ शकली नाही. त्यामुळे सत्तेत राहण्यात कोणताही अर्थ नव्हता. म्हणूनच आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्यावेळी घेतला असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताला नाही तर जगाला गरज”, मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी पक्षाला सतत पाळण्यामध्ये बघण्यात कारभार करत आलेले होते. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षापेक्षा काॅंग्रेसला भोगावा लागला. आज काॅंग्रेस राज्यात चौथ्या क्रमाकांवर गेली आहे. त्याला कारण फक्त पृथ्वीराज चव्हाण आहेत. असंही तटकरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदलला, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?” राऊतांनी नार्वेकरांना डिवचलं
हेही वाचा…रविकांत तुपकरांची तब्येत बिघडली, मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयावर कब्जा करणार ?
हेही वाचा…तब्बल १५३ कोटी रूपयाचा घोटाळा, ‘हा’ माजी मंत्री मुख्य आरोपी, आज निकाल लागणार
हेही वाचा…“राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला नसता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता”, माजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर फोडले खापर
हेही वाचा…“..त्यामुळे मी माझा शब्द मागे घेतो,” मनोज जरांगे पाटलांनी ‘तो’ शब्द मागे घेतला