सांगली : आगामी काही महिन्यात संपुर्ण देशात लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अलिकडेच पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिकेबाबत मोठी चर्चा केली होती. यावर आता कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोलिसांनी आदिवासींची संघर्ष यात्रा रोखली, त्यानंतर ठाण्यातच दिला ठिय्या आंदोलन
जगभरात सुरू असलेल्या युद्धांदरम्यान मोदी यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे तीन दिवस युद्धविराम मिळाला. हे फक्त मोदीच करू शकतात. पण काही मंडळी सुर्याला झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या गाडीला चालकच नाही हेच त्यांच्या ध्यानी येत नाही. कोणीही येतो आणि त्यांच्या गाडीत बसतो. पण चालक नसलेली ही गाडी धावणार कशी ? त्यामुळे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी येणे ही फक्त भारताचीच नव्हे, तर संपुर्ण जगाची गरज आहे. असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…“साहेब तुमच्या जिद्दीसमोर आम्ही सर्व नतमस्तक”, शरद पवारांची पावसातली सभा पुन्हा चर्चेत
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले होते, मात्र महाविकास आघाडी सरकारला न्यायालयात टिकविता आले नाही. महाराष्ट्रात सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची संतांची शिकवण आणि परंपरा आहे. यामुळे तेढ निर्माण होईल असे वक्तव्य टाळून मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चेला बसावा. चर्चेतून मार्ग निघू शकतो. असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे समिती बरखास्त करण्याची भुजबळांची मागणी, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
हेही वाचा…“..तरच राज्यातील सरकार कोसळेल”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार..”, केसरकरांच्या व्हिडीओवरून शरद पवार गटाने केली जहरी टिका
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणाबाबत धंगेकर पुन्हा आक्रमक, बुधवारपासून करणार ठिय्या आंदोलन
हेही वाचा…सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या थरारक प्रवासाची कहाणी, ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा