मुंबई : शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मिंधे सरकार ३१ ऑक्टोंबरला पडणार म्हणजे पडणार असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून केला जात आहे. यावरून आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं..,” शिक्षणमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत सुप्रिया सुळेंची टिका
सरकार पडणार की नाही, हे सभागृहातील बहुमतावर अवलंबून आहे. कुणाच्याही भविष्यावाणीकडे पाहण्याची मला आवश्यकता नाही. कारण, संविधानात सरकार पडणे आणि टिकण्याबद्दल तरतुदी आहेत. संख्याबळ असेल, तर सरकार टिकते. विधिमंडळात संख्याबळ नसेल, तरच सरकार कोसळेल. असं राहूल नार्वेकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी ‘या’ १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर, राज्यव्यापी दौरा
दरम्यान, सध्या विधिमंडळात शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून आपपली बाजू मांडली जात आहे. तर याचा निकाल ३१ डिसेंबरच्या अगोदर घेण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार..”, केसरकरांच्या व्हिडीओवरून शरद पवार गटाने केली जहरी टिका
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणाबाबत धंगेकर पुन्हा आक्रमक, बुधवारपासून करणार ठिय्या आंदोलन
हेही वाचा…सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या थरारक प्रवासाची कहाणी, ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोलिसांनी आदिवासींची संघर्ष यात्रा रोखली, त्यानंतर ठाण्यातच दिला ठिय्या आंदोलन
हेही वाचा…“साहेब तुमच्या जिद्दीसमोर आम्ही सर्व नतमस्तक”, शरद पवारांची पावसातली सभा पुन्हा चर्चेत