ठाणे : कोळी आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी धुळ्याहून मुंबई मंत्रालयाकडे निघालेली संघर्ष पदयात्रा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येतात मुंबईच्या वेशीवर पोलिसांनी रोखून धरली आहे. त्यांनतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी आंनदनगर जकात नाका याठिकाणीच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा…“वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते,” थेट भुजबळांच्या गाडीजवळ गाडी लावत दिला इशारा, वातावरण चिघळलं
कोळी समाजाला अनुसूचित जातीच्या वैधता प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी धुळे ते मुंबई पायी मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा १७ नोव्हेंबरला सुरू झाला असून मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पोहचला आहे. परंतु याठिकाणी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. धुळ्याहून इथपर्यंत येताना सर्व ठिकाणी पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं, कुठेही आमची अडवणूक केली गेली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलीस बळाचा वापर करून आम्हाला रोखलं असं संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…हातपाय तोडण्याची भाषा, ओबीसी विरूद्ध मराठा संघर्ष पेटतोय, बच्चू दिला इशारा
दरम्यान, जर आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही तर आम्ही याच ठिकाणी बसून आमरण उपोषण सुरू करू. अन् आमची भूमिका या संघर्ष पदयात्रेचे आयोजक शानाभाऊ सोनवणे यांनी घेतली आहे. नंदूरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी कोळी समाज आहे. या समाजावर सरकार अन्याय करत आहे.. त्यामुळेच कोळी समाजाला न्याय मिळावा यासाठी कोळी समाज आक्रमक झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“साहेब तुमच्या जिद्दीसमोर आम्ही सर्व नतमस्तक”, शरद पवारांची पावसातली सभा पुन्हा चर्चेत
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं..,” शिक्षणमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत सुप्रिया सुळेंची टिका
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी ‘या’ १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर, राज्यव्यापी दौरा
हेही वाचा…“शिंदे समितीचं कामं संपलंय, आता शिंदे समिती बरखास्त करा,” छगन भुजबळांची मोठी मागणी
हेही वाचा…“सत्तेची नशा आहे की, सत्तेतून आलेला उन्मत्तपणा?” शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल