पुणे : मराठवाड्यातील निजामकालीन कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरूवातीला शिंदे समितीला देण्यात आलं होतं. यासंदर्भात काही कागदपत्रांची तपासणी करण्याची शिंदेंची नेमणूक केली. याबाबत मला विचारण्यात आल्यानंतर त्याला होकार दिला. सुरूवातीला पाच हजार लोकांच्या नोंदी सापडल्या. त्यानंतर साडेअकरा हजार, त्यानंतर वाढत वाढत जाऊन या नोंदी वाढत गेल्या. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात दिसून आलं. त्यानंतर आता मराठवाड्यातील काम संपलेलं आहे. इतर ठिकाणी देखील काम संपत आलं आहे. त्यामुळे आता शिंदे समिती बरखास्त करा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्यावर आता मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“साहेब तुमच्या जिद्दीसमोर आम्ही सर्व नतमस्तक”, शरद पवारांची पावसातली सभा पुन्हा चर्चेत
छगन भुजबळांनी शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सत्य बाहेर काढणं हे सरकारचं काम असतं. ते सत्य बाहेर निघालंच पाहिजे, त्यासाठी समितीचं काम संपू शकत नाही. त्यामुळे नोंदी शोधण्याचं काम थांबवायचं नाही, तर नाही तर मराठा समाजाच्या रोषाला बळी पडावं लागेल. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं..,” शिक्षणमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत सुप्रिया सुळेंची टिका
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला आमचा विरोध आहे. याची कायद्यात देखील तरतुद नाही, परंतु जे लोक संविधानाच्या कायद्यात बसतात. त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मराठवाड्यात निजामकालीन वंशवळ तपासून त्यांची नोंद असेल तर ते कुणबी झालेत. त्यामुळे जे खरे कुणबी आहेत. त्यांना ओबीसीत घ्या. असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंनी ‘या’ १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर, राज्यव्यापी दौरा
दरम्यान, प्रकाश शेंडगे यांच्याकडे काही कागदपत्र पाठविली आहेत. यामध्ये पुर्वी ताकाने वशंवळी लिहिल्या जात होत्या. आता पेनाने कुणबी अशी जात लिहिली जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. मुळात कुणबी असेल तर त्यांनी निश्चितपणे घ्यावे, शरद पवारांच्या वेळी मंडल आयोग लागू झाला. तेव्हा जाती होत्या, आता त्यात खुप वाढल्या आहेत. यातच आताच्या जातीत खाडाखोड केली जात असल्याचा आरोपही छगन भुजबळांनी लावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..तरच राज्यातील सरकार कोसळेल”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार..”, केसरकरांच्या व्हिडीओवरून शरद पवार गटाने केली जहरी टिका
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणाबाबत धंगेकर पुन्हा आक्रमक, बुधवारपासून करणार ठिय्या आंदोलन
हेही वाचा…सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या थरारक प्रवासाची कहाणी, ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात पोलिसांनी आदिवासींची संघर्ष यात्रा रोखली, त्यानंतर ठाण्यातच दिला ठिय्या आंदोलन