बुलढाणा : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य न झाल्याने आता मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. त्याआधी चिखली तालुक्यतील सोमठाणा येथील ग्रामस्थांनी त्यांचं औक्षण केलं आहे. यातच आता रविकांत तुपकर मुंबईत काय भूमिका घेणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…शिंदे समिती बरखास्त करण्याची भुजबळांची मागणी, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
सोयाबीन, कापूस प्रश्नासाठी रविकांत तुपकर यांनी मागील चार दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. अन्नत्याग आंदोलनाने तुपकर यांची तब्येत खालावली आहे. थोड्याच वेळात कार्यकर्त्यांसह मुंबईला निघणार आहेत. उद्या २९ नोव्हेंबरला मंत्रालयावर त्यांचा मोर्चा पोहचणार आहे.
हेही वाचा…“..तरच राज्यातील सरकार कोसळेल”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान, राजकीय हालचाली वाढल्या
दरम्यान, मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिल्यानंतर रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु शेतकऱ्यांनी पोलिस स्टेशनबाहेरच ठिय्या दिल्यानंतर तुपकरांची पोलिसांनी सुटका केली. त्यानंतर त्यांनी चिखली येथील सोमठाणा येथे अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर ते आता मुंबईला रवाना झाले आहेत.
हेही वाचा…“सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार..”, केसरकरांच्या व्हिडीओवरून शरद पवार गटाने केली जहरी टिका
चार दिवसापासून अन्नाचा कण खाल्ला नाही आणि मागण्या मान्य होईपर्यंत खाणारही नाही. सोयाबीन कापुस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या, सोयाबीन कापसाला दरवाढ द्या. हमीभाव तुम्ही देऊ शकत नाही, कारण तुम्ही बिकारचोट आहेत. परंतु सोयाबीन निर्यात करा. तेलावरचे आयात शुल्क वाढवा. जीएसटी व्यवस्था रद्द करा. कापसाच्या गाठी आयात करू नका. दुष्काळ जाहीर करा. अशा अनेक आमच्या मागण्या असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…तब्बल १५३ कोटी रूपयाचा घोटाळा, ‘हा’ माजी मंत्री मुख्य आरोपी, आज निकाल लागणार
हेही वाचा…“राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला नसता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता”, माजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर फोडले खापर
हेही वाचा…“..त्यामुळे मी माझा शब्द मागे घेतो,” मनोज जरांगे पाटलांनी ‘तो’ शब्द मागे घेतला
हेही वाचा…पक्षाच्या एकनिष्ठ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांनी जाहीर केलं नाव
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताला नाही तर जगाला गरज”, मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान