मुंबई : मराठा आरक्षणासाठी आता दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. माजी खासदार संभाजी राजे दिल्लीत दाखल झाले असून ते मागास वर्ग आयोगाची भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान नेमक्या काय चर्चा होतात ? ते पाहाणं महत्वाचं ठरणार आहे. यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे.
हेही वाचा…“सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार..”, केसरकरांच्या व्हिडीओवरून शरद पवार गटाने केली जहरी टिका
मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बॅंकेबाबत मोठा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले. राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाठिंबा काढून घेतला नसता तर काॅंग्रेस आघाडीचे सरकार आले असते आणि सध्याचा मराठा आरक्षणाचा प्रश्ननही सुटला असता. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणाबाबत धंगेकर पुन्हा आक्रमक, बुधवारपासून करणार ठिय्या आंदोलन
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वप्रथम मी प्रयत्न केले. सरकार असते तर आरक्षण न्यायालयातही टिकविता आले असते. असंही चव्हाणांनी म्हटलं. कॉम्पिटिटर्स फाऊंडेशन आणि राजीव सातव विचार मंचातर्फे साखर संचालक संजय कुमार भोसले यांना दिवंगत खासदार संसदरत्न राजीव सातव पुरस्कार चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळे मी माझा शब्द मागे घेतो,” मनोज जरांगे पाटलांनी ‘तो’ शब्द मागे घेतला
हेही वाचा…पक्षाच्या एकनिष्ठ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांनी जाहीर केलं नाव
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताला नाही तर जगाला गरज”, मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान
हेही वाचा…शिंदे समिती बरखास्त करण्याची भुजबळांची मागणी, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
हेही वाचा…“..तरच राज्यातील सरकार कोसळेल”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान, राजकीय हालचाली वाढल्या