मुंबई : शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मिंधे सरकार ३१ ऑक्टोंबरला पडणार म्हणजे पडणार असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून केला जात आहे. सरकार पडणार की नाही, हे सभागृहातील बहुमतावर अवलंबून आहे. कुणाच्याही भविष्यावाणीकडे पाहण्याची मला आवश्यकता नाही. कारण, संविधानात सरकार पडणे आणि टिकण्याबद्दल तरतुदी आहेत. संख्याबळ असेल, तर सरकार टिकते. विधिमंडळात संख्याबळ नसेल, तरच सरकार कोसळेल. असं राहूल नार्वेकर यांनी म्हटलंय. त्यावरून आता संजय राऊतांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताला नाही तर जगाला गरज”, मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान
सध्याचं सरकार कधीच पडलं असतं. तुम्ही बेकायदा सरकारचे संरक्षक आहात. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यालयाने राजकीय गप्पा कमी करा असे निर्देश दिले आहेत. संवैधानिक आणि निष्पक्ष पदावर बसले आहात. तिथे बसून तुम्ही बेकायदा सरकारची वकिली करू शकत नाहीत. ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदलला. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेऊ शकतो ? असा खोचक सवालही राऊतांनी केलाय.
हेही वाचा…शिंदे समिती बरखास्त करण्याची भुजबळांची मागणी, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जिथे कुणी संविधान मानणारी व्यक्ती बसली असती, तर आत्तापर्यंत हे सरकार कोसळलं असतं. सरकार कधी जाणार हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे हे सरकार कधी जाणार असंही राऊतांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…रविकांत तुपकरांची तब्येत बिघडली, मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयावर कब्जा करणार ?
हेही वाचा…तब्बल १५३ कोटी रूपयाचा घोटाळा, ‘हा’ माजी मंत्री मुख्य आरोपी, आज निकाल लागणार
हेही वाचा…“राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला नसता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता”, माजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर फोडले खापर
हेही वाचा…“..त्यामुळे मी माझा शब्द मागे घेतो,” मनोज जरांगे पाटलांनी ‘तो’ शब्द मागे घेतला
हेही वाचा…पक्षाच्या एकनिष्ठ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांनी जाहीर केलं नाव