मुंबई : राज्यात मागील दोन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिकमध्ये द्राक्ष पिकाचं तसेच मराठवाड्यात देखील सोयाबीन तसेच मका पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…तब्बल १५३ कोटी रूपयाचा घोटाळा, ‘हा’ माजी मंत्री मुख्य आरोपी, आज निकाल लागणार
राज्य वाऱ्यावर पडलं असताना एक फुल दोन हाफ, दुसरे दोन हाफ कुठे आहेत, काही कल्पना नाही. असंविधानिक मुख्यमंत्री स्वत: चं घर सोडून दुसऱ्याची घरं धुंडाळतात. स्वत: च घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या पंचतारांकीत शेती माझ्या गरीब शेतकऱ्याला ही मिळो, ही मी ईश्वरचरणी प्राथर्ना करतो. रामलल्लाच्या दर्शनापेक्षा तुमचं दर्शन शेतकऱ्याला कधी देणार ? असा टोलाही ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
हेही वाचा…“राष्ट्रवादीने पाठिंबा काढून घेतला नसता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता”, माजी मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर फोडले खापर
तसेच महाराष्ट्रात निवडणुका आल्यावर जर तुमच्या तिजोरीची दारं उघडणार असतील तर तोपर्यंत महाराष्ट्राची जबाबदारी कोण घेणार ? मुख्यमंत्री, पंतप्रधानांना इतर राज्यात प्रचार करायला, रेवडी उडवायला वेळ आहे. मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला तुम्ही कधी येणार ? असाही सवाल त्यांनी केला.
हेही वाचा…“..त्यामुळे मी माझा शब्द मागे घेतो,” मनोज जरांगे पाटलांनी ‘तो’ शब्द मागे घेतला
दुसऱ्याच्या राज्यात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वत:च घरं, स्वत: चं राज्य का नाही सांभाळत ? भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा. आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांची वाट बघतोय, तुमच्या ट्रिपल इंजिनमधून थापांचे धुर न सोडता बळीराजाला भरघोस मदत करा. मी शिवसैनिकांना आवाहन करतो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा. त्यांना दिलासा द्या, असंही ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केलंय. ज्यांची कोणावर निष्ठा नाही ते वस्तुनिष्ठ माहिती काय घेणार असा सवाल करत ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच,” ‘या’ भाजप नेत्याने रोहित पवारांना डिवचलं
हेही वाचा…“मोदींशी महात्मा गांधींशी तुलना, राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला”, म्हणाले..
हेही वाचा…“पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरून सुपारी देऊन पाठवलं होतं, मग..,”सत्तेतून का बाहेर पडलो? तटकरेंनी दिलं उत्तर
हेही वाचा…“ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदलला, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?” राऊतांनी नार्वेकरांना डिवचलं
हेही वाचा…रविकांत तुपकरांची तब्येत बिघडली, मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयावर कब्जा करणार ?