पुणे : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्या, यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. फक्त बाळासाहेबांचे विचार बोलून नाही तर कृतीतून दाखवून द्या, असा टोलाही राज ठाकरे यांनी शिंदेंना लगावला. सध्या ते पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलत होते.
हेही वाचा…रविकांत तुपकरांची तब्येत बिघडली, मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयावर कब्जा करणार ?
आपलं सरकार फक्त मराठी आणि हिंदुत्वबद्दल फक्त तोंड वाजवायला आहे. बाळासाहेबांचे विचार सारखं बोलतं कोणते बाळासाहेबांचे विचार तुम्ही घेतले? कोर्टातल्या आदेशानंतरही पाट्या काढत्या आल्या नाहीत. त्यावेळी मशिदीवरील भोंगे काढायला सांगितले होते. ते पण या लोकांना काढता आले नाही. असंही राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…तब्बल १५३ कोटी रूपयाचा घोटाळा, ‘हा’ माजी मंत्री मुख्य आरोपी, आज निकाल लागणार
नुसत फक्त बोलायचं की बाळासाहेबांचे विचार. मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा. ज्यावेळी आम्ही मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. शासनाचा काही धाक आहे की नाही. कोर्टाची काही भीती आहे की नाही ? महाराष्ट्रातील पोलिसांवर माझा प्रचंड विश्वार आहे. त्यांना फक्त २४ तासांची मोकळीक दिली पाहिजे. सगळं वटणीवर आणून ठेवतील. परंतु त्यांना आणायचंच नाही. कारण तो ड्र्ग्जचा पैसा सगळीकडे वाटून ठेवला आहे की काय ? असा प्रश्न निर्माण होतो. असंही राज ठाकरे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा, महाराष्ट्रात आम्ही निवडणुकांची वाट बघतोय,”
हेही वाचा…“मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच,” ‘या’ भाजप नेत्याने रोहित पवारांना डिवचलं
हेही वाचा…“मोदींशी महात्मा गांधींशी तुलना, राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला”, म्हणाले..
हेही वाचा…“पृथ्वीराज चव्हाणांना दिल्लीवरून सुपारी देऊन पाठवलं होतं, मग..,”सत्तेतून का बाहेर पडलो? तटकरेंनी दिलं उत्तर
हेही वाचा…“ज्यांनी १० वेळा स्वार्थासाठी पक्ष बदलला, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?” राऊतांनी नार्वेकरांना डिवचलं