मुंबई : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या वेगवेगळ्या भागातील शेतकरी व बागायतदार यांचं मोठं नुकसान झालं आहे. या सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे जाहीर करते, परंतु शेतकरी व बागायतदार यांच्या हाताला काहीच मिळत नाही. यावर्षी सुद्धा नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि झालेली प्रंचड गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेला कांदा, मोसंबी, पपई, डाळिंब टोमॅटो, कापूस, तूर, ज्वारी, हरभरा गहू, इं पिकांचे अतोनात हानी झाली आहे. याची पाहणी करण्याची शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काही नेत्यांची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा…“तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत बोलणार ?” उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला टोला
नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, डहाणू, पालघर या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत भेट देणार आहेत. यासह त्यांच्यासोबत नितीन बानगुडे, नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर पदाधिकारी असणार आहे.
हेही वाचा…“नुसत फक्त बोलायचं बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना”, राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे भेट देणार आहेत. यांच्यासोबत लक्ष्मण वडले, वसिम देशमुख, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेल्या पीकांचे अतोनात हानी झालेली आहे. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने शिवसेना नेते खासदार @Vinayakrauts आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते @iambadasdanve ह्या नुकसानग्रस्त भागांना बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर… pic.twitter.com/h1UCa21jrc
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मावळात पेच वाढला, महायुतीच्या तिन्हीही नेत्यांचा जागेवर दावा, ठाकरे फायदा उचलणार ?
हेही वाचा…“शरद पवार पावसात भिजले हा 2024 साठी शुभ शकुन”, महाराष्ट्राचं चित्र पुन्हा बदलणार का ?
हेही वाचा…“आंबेडकरांचं नाव नवीन संसद भवनाला देण्यात यावे”, बिचुकलेंची मागणी, कार्यकर्त्यांनी थेट दुग्धाभिषेक घातला
हेही वाचा…“पण तुम्ही डबल इंजिनाची गाडी गाळात घातली”, चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…“विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजे”, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला संताप