पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. यातच राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई हायकोर्टानकडून रोहित पवारांना मोठा दिलासा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…आरोप केले तर सिद्ध करून दाखवा, दानवेंनी वडेट्टीवारांना दिले थेट आव्हान
कोणतीही कारवाई कधी कोणी जाणून बुजून करत नाही, मागच्या वर्षी श्रीनिवास पवार यांच्या शरयू कारखान्याला देखील नोटीस आली होती. आमच्याही अनेक संस्थाना नोटीस आल्या आहेत. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला देखील नोटीस आली आहे. नोटीस देणारी यंत्रणा त्यांचं ते काम करत असते. नोटीसीला उत्तर दिलं तर तो प्रश्न संपून जातो. या विषयाला राजकीय स्वरूप देऊ नये अशी माझी विनंती असल्याचं अजित पवारांनी सांगितले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा…“राष्ट्रवादीला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता, भाजपचा डीएनए ओबीसी”, फडणवीसांचा शरद पवारांना टोला
दरम्यान, येत्या ६ ऑक्टोंबरला बारामती अॅग्रोबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत बारामती अॅग्रोबाबत कोणतीही कारवाई करू नका, असे आदेश मुंबई हाय कोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाला देण्यात आले आहेत. त्यामुळे रोहित पवारांना कोर्टाकडून तात्पुरता मोठा दिलासा मिळाला आहे. यातच आता ६ ऑक्टोबरच्या सुनावणीत मुंबई हायकोर्ट काय निर्णय घेणार ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांनी अजित पवार अन् शिंदेंना दिला कानमंत्र, वर्षावर रात्री उशिरापर्यंत बैठक
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंना ‘ती’वाघनखे स्वत; ची वाटत असावीत”, शिंदे गटाचा ठाकरेंना टोला
हेही वाचा…ठाकरे गटाचा दक्षिण मुंबई लोकसभेचा उमेदवार ठरला, शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देणार
हेही वाचा…“गौतमी पाटीलचा डान्स शाळेत भरवणाऱ्यांना घरी जावं लागेल”, शिक्षणमंत्र्यांनी दिला कारवाईचा आदेश
हेही वाचा…पाच राज्यांत भाजपला पराभवाचा धोका, निवडणुकांच्या आधीच मोदींच्या सभांचा जंगी कार्यक्रम जाहिर