पुणे : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार युवकांचे प्रश्न घेऊन सरकारवर हल्लाबोल करतांना दिसत आहेत. स्पर्धा परिक्षा, कंत्राट भरती, पेपर पुट आणि इतर विषय घेऊन रोहित पवार दसऱ्यापासून महाराष्ट्रात युवा संघर्ष यात्रा करणार आहे. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा तब्बल १३ जिल्ह्यातून जाणार असून याचा मोठा फटका आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना बसण्याची आता शक्यता राजकीय वर्तुळात वर्तुवली जात आहे.
हेही वाचा…शरद पवारांना सर्वात मोठा धक्का..! राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराचं लोकसभेतून निलंबन
काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिर अशी भारत जोडो यात्रा काढली. त्यानंतर कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव करत काॅंग्रेसने भारत जोडो यात्रेचं फळ मिळालं. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या सीमेलगतहून गेली. परंतु रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा पुण्याहून सुरू होऊन नागपुरला संपणार आहे म्हणजे ही यात्रा मराठवाडा आणि विदर्भातून जाणार असून तब्बल ८२० किलोमीटरच्या प्रवासात रोहित पवार दिवसाला १७ ते २३ किमी पायी चालणार आहे. तरूणांचे प्रश्न घेऊन यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात रोहित पवार सत्ताधाऱ्यांची चिरफाड करणार अशी चर्चाही आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रोहित पवार अगदी कमी कालावधीत युवा वर्गांचा चाहता बनला आहे. महाराष्ट्रात रोहित पवारांना मानणारा युवक वर्ग मोठा आहे. त्यामुळे युवा वर्गाला वळवण्याचा प्रयत्न रोहित पवार करणार आहेत. यातच रोहित पवारांच्या युवक संघर्ष यात्रेला युवकांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सरकारचे धाबे दणाणल्याशिवाय राहणार नाही. यातच भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, कुटुंब फोडले तरीही आम्ही लढत आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून हजार रुपये का घेता प्रश्न विचारल्यावर सरकार विद्यार्थी सिरियस नाहीत म्हणतात. आंदोलने, उपोषण केले तरी केवळ शब्द मिळतो. कंत्राटी भरती रद्द करण्यात यावी, विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी हजार रुपये फी रद्द करण्यात यावा व आजवर घेतलेले १००० रुपये परत करण्यात यावेत, दत्तक देण्यात येणाऱ्या शाळांचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशा मागण्या या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचंही रोहित पवारांनी सांगितलंय.
हेही वाचा…“एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही”, बच्चू कडूंचं थेट भाजपलाच आवाहन
यातच मध्यंतरी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरणात बदल झाला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आपापल्या पक्षात बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. शिंदे आणि अजित पवारांनी पक्षांवर दावा सांगितला खरा, परंतु महाराष्ट्रातील लोकांची सहानूभूती ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. रोहित पवारांच्या पाठीवर शरद पवारांचा हात असल्याने राज्यात युवा संघर्ष यात्रेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे. यासोबत ठाकरे आणि शरद पवारांच्या सहानुभूतीचाही लाभ रोहित पवारांना होणार असल्याचा अंदाज आता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. यातच राज्यात लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचा महासंकल्प भाजपने ठेवला आहे. यासाठी भाजपने प्रत्येक मतदारसंघात मोठी यंत्रणा उभी केली असून राज्यातील मंत्र्यांना याची जबाबदारी सोपवली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वारंवार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतांना दिसत आहेत. त्यातच रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा याच लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यातच रोहित पवारांची ही यात्रा भाजपच्या महाविजय २०२४ ला खिंडार पाडत जाणार का ? अशी शक्यताही आता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…अजित पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, फटाके फोडत कार्यकर्त्यांचा जल्लोष
दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून पुण्यातील लाल महाल, देहू आळंदी संत पिठाला नतमस्तक होत यात्रेला सुरुवात होईल. एकूण ८२० किलोमीटरची ही यात्रा असणार आहे. १३ जिल्ह्यामध्ये ही यात्रा प्रवास करेल. या यात्रेदरम्यान कोणतीही गाडी, सायकल वापरणार नसून पायी चालत दिवसाला १७ किलोमीटर तसेच जास्तीत जास्त २३ किमी चालणार आहोत. या युवा संघर्ष यात्रेत फक्त शरद पवारांचा फोटो असेल. यात्रेत कोणताही लोगो नसणार असून कुणालाही सहभाग घेता येणार असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. ७ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात देखील युवकांचे प्रश्न मांडण्यात येणार आहे. युवा संघर्ष यात्रा यापूर्वी पासूनदेखील माझ्यावर कारवाई सुरू आहे. आता देखील नोटीस आली तरी संघर्ष यात्रा काढली जाईल. मी हार मानून घरी बसणार नाही. युवक त्यांच्या प्रश्नांवर किती गंभीर आहेत हे सरकारला दाखवून देऊ. असा इशाराही रोहित पवारांनी सरकारला दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“५६ वर्षात शरद पवार एकही निवडणुक हरले नाहीत, ” सुप्रिया सुळेंनी सांगितलं रहस्य, म्हणाल्या..,
हेही वाचा…आली समीप घटिका..! एकनाथ शिंदें दिल्लीला तात्काळ रवाना
हेही वाचा…शरद पवार गटाकडून ‘हा’ बडा वकिल युक्तिवाद करणार, शरद पवारांची रणनीती तयार
हेही वाचा…पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार, आरोपीने नगरसेविकेकडून दहा लाख रूपयेही उकळले
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली, जागा वाटपासाठी समिती स्थापन, ‘या’ नेत्यांचा समावेश