मुंबई : राष्ट्रवादी पक्ष चिन्ह आणि पक्षनाव याबाबत निवडणुक आयोगात आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी हे नावावर दोन्ही गटाने दावा सांगितला होता. त्या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं असतांनाच शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल लोकसभेतून पुन्हा अपात्र झाल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा…पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण भरत गोगावलेंना संधी नाहीच, गोगावले म्हणाले की, “देवीच्या मनात असेल तर..,”
२००९ मधल्या एका राजकीय खूनाच्या प्रकरणात मोहम्मद फैजल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात फैजल यांना सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठवली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. परंतु नंतर फैजल यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हाय कोर्टाने त्यांच्या शिक्षेवर तात्पुरती स्थगिती दिली होती. त्यानंतर पीडितांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली.
हेही वाचा…“खोके सरकार म्हणजे अजित पवार पण त्यात आहेत का?”शिंदेंच्या मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
मोहम्मद फैजल यांनी हायकोर्टात धाव घेतल्यानंतर या शिक्षेवर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना लोकसभेचं सदस्यस्व पुन्हा बहाल करण्यात आलं. परंतु यातच आता पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा हायकोर्टाकडे पाठवलं. त्यामुळे त्यांचं एकाच वर्षात दोन वेळा अपात्र ठरवण्याची वेळ आली आहे. केरळ हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्याने लोकसभा सचिवालयाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा…“शासनाकडून बड्या वकिलांची केस उभी केली जाणार,” बारामती अॅंग्रोबाबत रोहित पवारांचं मोठं भाकित
दरम्यान, मोहम्मद फैजल यांच्यावर कारवाई केल्यानंतर शरद पवार गटाचे लोकसभेत आता तीनच खासदार आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील सध्या शरद पवार गटात आहेत. तर सुनील तटकरे अजित पवार गटात दाखल झाले आहेत. यातच आज होणाऱ्या निवडणुक आयोगाच्या सुनावणीत काय निर्णय लागणार ? त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही”, बच्चू कडूंचं थेट भाजपलाच आवाहन
हेही वाचा…अजित पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, फटाके फोडत कार्यकर्त्यांचा जल्लोष
हेही वाचा…आमदारांना ५००-५०० कोटींचा निधी, आरोग्य व्यवस्थेला ५० कोटी दिले असते तर आज शेकडो जीव वाचले असते
हेही वाचा…मुंबईतील सहापैकी ‘या’ तीन जागांवर काॅंग्रेस आग्रही, लोकसभेच्या जागा वाटपावरून ठाकरे अन् काॅंग्रेसमध्ये संघर्ष होणार
हेही वाचा…दादा भुसेंनी नाशिकचा गड राखला, भुजबळांनी थेट संख्याबळच दाखवलं, पालकमंत्री पदावरून तिढा कायम