मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यात सुरूवात केली आहे. या निवडणुकांसाठी आता बैठकांचं सत्र देखील सुरू असून ठाकरे गट मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी ४ मतदारसंघासाठी आग्रही असून दोन मतदारसंघ काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु मुंबईमध्ये सहापैकी तीन जागांवर काॅंग्रेस आग्रही असल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! अजित दादांकडे पुण्याचे पालकमंत्री पद, चंद्रकांत पाटलांची उचलबांगडी
काॅंग्रेसचे माजी खासदार आणि नेते संजय निरूपम यांनी असं म्हटलं की मुंबईतील सहापैकी तीन लोकसभेच्या जागांवर काॅंग्रेस आग्रही राहणार आहे. उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबई या तीन जागा काॅंग्रेससाठी महत्वाच्या आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मी स्वत: उमेदवार म्हणून आग्रही असल्याचे निरूपम यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा व्हा,” शरद पवारांच्या ‘या’ भिडूकडून अजित पवारांना आवाहन
मुंबईतील दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही आहे. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटातील राहुल शेवाळे खासदार आहेत. तर दक्षिण मध्य मुंबईची जागा भाजपकडे आहे. आता या दोन्ही मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाकडून निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, नार्वेकरांनी ठाकरे गटावर केलेत अप्रत्यक्ष आरोप
दरम्यान, मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागांवर ठाकरे गटाने दावा सांगितला असून महाविकास आघाडीची ४-१-१ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबी या दोन जागा राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससाठी ठाकरे गटाने सोडली आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटातील नेत्यांनी या मतदारसंघाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…दादा भुसेंनी नाशिकचा गड राखला, भुजबळांनी थेट संख्याबळच दाखवलं, पालकमंत्री पदावरून तिढा कायम
हेही वाचा…पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण भरत गोगावलेंना संधी नाहीच, गोगावले म्हणाले की, “देवीच्या मनात असेल तर..,”
हेही वाचा…“खोके सरकार म्हणजे अजित पवार पण त्यात आहेत का?”शिंदेंच्या मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
हेही वाचा…“शासनाकडून बड्या वकिलांची केस उभी केली जाणार,” बारामती अॅंग्रोबाबत रोहित पवारांचं मोठं भाकित
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांना पालकमंत्री मिळालं, पण ‘या’ दोन जिल्ह्यासाठी अजित पवारांची ताकद पडली कमी