अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडात अपक्ष आमदार बच्चू कडू यांची जोरदार चर्चा होती. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री पदावरून बच्चू कडूंची सातत्याने चर्चा होती. परंतू अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर बच्चू कडूंनी मंत्रीपदावरून दावा सोडला. यानंतर आता भाजपकडून मला त्रास दिला जात असल्याचा बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“खोके सरकार म्हणजे अजित पवार पण त्यात आहेत का?”शिंदेंच्या मंत्र्यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
एकीकडे आम्हाला सांगायचं की सत्तेमध्ये या आणि दुसरीकडे मित्रत्व पाळायचं नाही हे भाजपचं सुरू आहे. काही करून बच्चू कडू यांना पाडा. असं सांगितलं जातं. परंतु मी बावनकुळेंना सांगतो , एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडून पडणार नाही. असा थेट इशाराच बच्चू कडू यांनी भाजपला दिला आहे. वाशिमध्ये एका दिव्यांग मेळाव्याला संबोधित करत होते. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“शासनाकडून बड्या वकिलांची केस उभी केली जाणार,” बारामती अॅंग्रोबाबत रोहित पवारांचं मोठं भाकित
दरम्यान, आपल्या मतदारसंघात काॅंग्रेस आणि इतर पक्षांचा आपल्याला त्रास नाही. परंतु आपल्या मतदारसंघात भाजप आपल्याला त्रास देत आहे. असा खळबळजनक आरोप बच्चू कडू यांनी भाजपवर लावले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, फटाके फोडत कार्यकर्त्यांचा जल्लोष
हेही वाचा…आमदारांना ५००-५०० कोटींचा निधी, आरोग्य व्यवस्थेला ५० कोटी दिले असते तर आज शेकडो जीव वाचले असते
हेही वाचा…मुंबईतील सहापैकी ‘या’ तीन जागांवर काॅंग्रेस आग्रही, लोकसभेच्या जागा वाटपावरून ठाकरे अन् काॅंग्रेसमध्ये संघर्ष होणार
हेही वाचा…दादा भुसेंनी नाशिकचा गड राखला, भुजबळांनी थेट संख्याबळच दाखवलं, पालकमंत्री पदावरून तिढा कायम
हेही वाचा…पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण भरत गोगावलेंना संधी नाहीच, गोगावले म्हणाले की, “देवीच्या मनात असेल तर..,”