मुंबई : राज्यात सत्तातंरण झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रित लढणार असल्याच्या तयारीत आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामाना आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. यातच आता लोकसभेतील जागा वाटप निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीकडून समिती स्थापन केली आहे. या समितीत महाविकास आघाडीतील प्रत्येकी तीन तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…दादा भुसेंनी नाशिकचा गड राखला, भुजबळांनी थेट संख्याबळच दाखवलं, पालकमंत्री पदावरून तिढा कायम
लोकसभेतील जागा वाटप निश्चित करण्यासाठी महाविकास आघाडीकडून समिती स्थापन केली आहे. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत, विनायक राऊत, आणि अनिल देसाई, तर काॅंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान, आणि राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांचा समावेश करण्यात आला आहे. तीनही पक्षांचे तीन तीन नेते जागावाटप अंतिम करणार आहे.
हेही वाचा…पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण भरत गोगावलेंना संधी नाहीच, गोगावले म्हणाले की, “देवीच्या मनात असेल तर..,”
दरम्यान, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. परंतु यातील सहापैकी ३ लोकसभा काॅंग्रेस लढविण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील समिती याबाबत काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच आता लोकसभेच्या ४८ जागांपैकी कोणाच्या वाटेला किती जागा येणार? तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांना सर्वात मोठा धक्का..! राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराचं लोकसभेतून निलंबन
हेही वाचा…“एक नाही तर दहा खासदार पाठवा, बच्चू कडू पडणार नाही”, बच्चू कडूंचं थेट भाजपलाच आवाहन
हेही वाचा…अजित पवारांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, फटाके फोडत कार्यकर्त्यांचा जल्लोष
हेही वाचा…आमदारांना ५००-५०० कोटींचा निधी, आरोग्य व्यवस्थेला ५० कोटी दिले असते तर आज शेकडो जीव वाचले असते
हेही वाचा…मुंबईतील सहापैकी ‘या’ तीन जागांवर काॅंग्रेस आग्रही, लोकसभेच्या जागा वाटपावरून ठाकरे अन् काॅंग्रेसमध्ये संघर्ष होणार