मुंबई : मागील अनेक महिन्यांपासून चीनसोबत एलएसीवर संघर्ष सुरू आहे. चीन आणि भारतामधील हा संघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे दिसत आहे. चीनने हिमाचल प्रदेशमध्ये एका गाव वसवल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्यावरून आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर हल्ला चढवण्यात आला आहे.
आपल्या हद्दीत चीन नवीन गाव उभारत असताना आपले प्रधान सेवक, चौकीदार वगैरे म्हणवणारे शक्तिशाली सरकार काय करत होते ? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
चीनने उभारलेल्या गावाचा समोर आलेला धडधडीत पुरावा पाहून कुठल्याही सार्वभौम देशातील नागरिकाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. प्रश्न इतकाच आहे की, जनतेच्या मनातील ही आग सरकारच्या मस्तकात जाणार आहे काय?, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
‘पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राइक किंवा पुलवामा हत्याकांडानंतर पाकिस्तानवर केलेले एअर स्ट्राइक याचे पुरेपूर भांडवल आणि मार्केटिंग करणारे चिन्यांच्या नवीन घुसखोरीबाबत मिठाची गुळणी धरून बसणार नाहीत, अशी जनतेला अपेक्षा आहे. एखादा मजबूत वाडा घुशींनी पोखरून काढावा तशीच घुसखोरी करून हिंदुस्थानचे लचके तोडण्याचे काम चिन्यांनी चालवले आहे. ते किती काळ सहन तरी करायचे?’
‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’, असे एका ओळीचे परराष्ट्र धोरण खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच जाहीर केले आणि ते गाजलेही खूप. त्याच विधानाला जागून हिंदुस्थानात चिनी गाव उभारणाऱ्या चिन्यांविरुद्ध पंतप्रधान नक्कीच एखादा ‘मास्टरस्ट्रोक’ मारतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही. अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?, असा प्रश्न सेनेने पंतप्रधान मोदींना केला आहे.
Read Also :
- … तर तुमचा वीज पुरवठा खंडित होणार, महावितरण देणार ‘शॉक’
- महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार, पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय
- ‘ओबीसी नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न’
- ‘कोण आहे जेपी नड्डा ? मी त्यांना का उत्तर देऊ ?’, राहुल गांधींचा निशाणा
- संसदेत खासदारांना मिळणाऱ्या जेवणावरील अनुदान बंद, पदार्थ महागणार