मुंबई : लॉकडाऊनच्या काळानंतर सर्वसामान्यांना आलेल्या वाढीव वीज बिलामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. यावरून राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले होते. मात्र आता ग्राहकांनी वीज बिल भरलेले नसेल तर त्यांचा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. डिसेंबरअखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औद्योगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. मात्र आता ही मूभा देखील समाप्त झाली आहे. थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने वीजबिल वसुलीची मोहीम राबवली जाणार आहे.
Read Also :
- महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार, पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय
- ‘ओबीसी नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न’
- ‘कोण आहे जेपी नड्डा ? मी त्यांना का उत्तर देऊ ?’, राहुल गांधींचा निशाणा
- संसदेत खासदारांना मिळणाऱ्या जेवणावरील अनुदान बंद, पदार्थ महागणार
- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची वर्णी ?