नाशिक : शेतकरी आत्महत्या ह्या राज्यानं फार पाहिल्या पण शेतकऱ्याचा आसूड अजून पाहिला नाही. हा आसूड बेजबाबदार सरकारी धोरणांवर ओढत, रयत क्रांती संघटनेच्या यशस्वी कोकण दौऱ्यानंतर झंझावाती दुसरा टप्पा धडकणार थेट खान्देश, विदर्भ, मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये धडकला आहे. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा राज्यव्यापी दौऱ्याच्या वेळी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी नाशिकमध्ये राज्य सरकारवर जोरदार टिका केली.
“रामभक्त उद्धव ठाकरेंची लंका खाक करतील”; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल
महाराष्ट्राचे वाटोळे सध्या पवार आणि पवार कंपनीने केले आहे. या राज्यास आता पवारांपासून वाचवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यासाठी राज्यातील सरकार सध्या बारामती वरून चालतं. असा घणाघात देखील त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्र अभियान आम्ही सुरू केलं आहे. त्यात आम्ही राज्यव्यापी दौरा करणार आहोत. तसेच या सरकारविरोधात जोरदार आंदोलन उभं करू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचे दहा हजार भरणार हे आश्वासन देण्यात आले होते. दहा हजार सोडा शेतकऱ्यांची वीज सरकार कापू लागले आहेत. दुसरीकडे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार यांनी सांगितलं होतं. परंतु त्याचे पुढे काय झाले? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पीक विमा कर्ज, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये अद्याप दिलेले नाहीत. ही शोकांतिका म्हणावी लागेल, असंही ते म्हणाले.
“निवडणुकांच्या काळात थापांचा सुकाळ असतो, पुढच्या सभेत मनातलं बोलणार”; उद्धव ठाकरे
दरम्यान, राज्य सरकावर टिका करताना ते म्हणाले होते की, भाजप सत्तेत असताना बुलेट ट्रेन, हायपर लूप, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार etc अशा गोष्टीवर चर्चा असायचा. पण आता महाराष्ट्रात चर्चा असते ती देशमुख, मलिक कांड, खंडणी, हाणामारी, घरकोंबडा, पेपर घोटाळा, आरक्षणाचा बट्याबोळ अशा विषयावर असते. फरक समजून घ्या, असा इशारा देखील त्यांनी राज्यातील लोकांना दिला आहे.
Read also:
- “मोदींनी सात वर्षापुर्वी एक स्वप्न पाहिलं होेतं, ते पुर्ण होतंय”; फडणवीसांनी मोकळ्य़ा केल्या भावना
- “बबली मोठी झाली नाही, बबली अजून नासमज”; पेडणेकरांची नवनीत राणांवर मिश्किल टिप्पणी
- “ओबीसी आरक्षणाचा राज्यात नव्हे तर देशात भाजप सरकारने खुन केला”; छगन भुजबळ भाजपवर कडाडले
- राज्यातील राजकारण्यांना हिंदुत्वाचा वायरस; रोहित पवार, राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेही करणार अयोध्या दौरा
- “मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघ निवडावा, त्यांच्याविरोधात मी तिथे निवडणुक लढवेन”; नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज