मुंबई : शिवसेनेचे धनुष्य़बाण गोठवल्यानंतर निवडणुक आयोगाने दोन्ही गटाला चिन्ह दिले आहेत. यातच उद्धव ठाकरेंना निवडणुक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले आहे. मात्र धगधगती मशाल चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने पुन्हा दावा केला आहे. 1996 पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता ने निवडणुक आयोगाकडे धाव घेतली असून निर्णय अपेक्षित आहे. इतकेच नव्हे तर अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
“पालघरच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या साधूंना नक्की न्याय मिळेल”; गिरीश खत्री
1994 पासून ते 2014 पासून उद्धव ठाकरे यांना दिलेल्या मशाल या निवडणुक चिन्हा आम्ही निवडणुका लढविल्या होत्या. मात्र आता उद्धव ठाकरे यांना चिन्ह दिल्याने आमचा त्याच्यावर आक्षेप आहे. यासंदर्भात आम्ही निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून तिथे आम्हाला दाद मिळाली नाही तर आम्ही सुप्रिम कोर्टोत याचिका दाखल करणार आहोत असं समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी म्हटलं आहे.
“ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी…”; उद्धव ठाकरेंनी उंचावली हाती मशाल
दोन दिवसानंतर निवडणुक आयोगाच्या निकालावरून आम्ही अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात उमेदवाराबाबत निर्णय घेणार आहोत. 2014 नंतर आम्ही कोणत्याही प्रकारची निवडणुक लढविली नसल्याने निवडणुक आयोगाने आमचं चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता 2022 मध्ये आमच्या पक्षाची पुन्हा बांधणी करीत आहोत. मात्र ठाकरे गटाला जे चिन्ह देण्यात आलं त्यात भगवा रंग असून आमच्या चिन्हांमध्ये हिरवा आणि सफेत आहे. त्यामुळे लोकांना यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. हे चिन्ह आम्हाला 1994 सालीच चिन्ह दिलं आहे. त्यामुळे हा वाद आम्ही सोडवणार आहोत असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह दिल्यानंतर भुजबळ चर्चेत; छगन भुजबळ म्हणाले, “अनेकांचे रक्त आटलं…;”
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. तसेच भाजपकडून देखील मुरजी पटेल यांना उमेदवार मिळणार अशी चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणात ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also
- “अन् सुषमा अंधारे यांच्या रूपाने शिवसेनेला पुन्हा एकदा संजय राऊत मिळाले”; भाजपची जहरी टिका
- “नको त्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, कामं करा अगोदर”; रूपाली पाटलांनी फडणवीसांना खडसावलं
- शिंदेंना ढाल तलवार…! भाजपची ढाल, इडीची तलवार अन् जनतेवर वार..! ऱाष्ट्रवादीची टीका
- “पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही”; भाजपची ठाकरेंवर खरमरीत टीका
- अंधेरी निवडणुसाठी राष्ट्रवादी, काॅंग्रेस पाठोपाठ राजकीय पक्षांचा देखील ठाकरेंना पाठिंबा