मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊत यांनी स्तुती करणं हे राज्य सरकारची स्तुती करण्यासारखं आहे. महाराष्ट्राचं भंल झालं पाहिजे. यासाठी हा उठाव होता. त्याच्यामुळे आमची भूमिका त्यांना सुद्धा मान्य झाली. याचा आम्हाला आनंद आहे. ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. प्रवक्ते आहेत. व्यक्तिबद्दल व्यक्तिगत बोलायचं नसतं. टिका केली तेव्हा कडक शब्दात उत्तर दिलं. असं म्हणत मंत्री आणि बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी संजय राऊतांवर भाष्य केलं.
“शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले पण..;” अफजल खानच्या कबरीवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत त्यांना भेटायला जाणार असल्याचं म्हटलं. त्यावर दिपक केसरकर यांनी भाष्य केलं. तसेच दिपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, काही प्रवक्ते दिशाभुल करत होते. त्याला कुठेतरी ब्रेक बसला पाहिजे. संजय राऊत नसल्यामुळे माहीतगार कुणी प्रवक्ता नव्हता. राऊत यांची भाषा चुकीची असेल. अग्रेसिव्ह भाषेत ते बोलतात. पण ते विद्वान आहेत. हे मान्य केलं पाहिजे. असंही दिपक केसरकर म्हणाले.
“केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर..”; ठाकरेंचा हल्लाबोल
तसेच पत्रावाळ चाळीतील लोकांवर झालेल्या अन्यायाबाबतचं प्रकरण होतं. या प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मिळाला. हे सर्व प्रकरण वाचावं लागेल. तेव्हा मी याबाबत बोलेन. तो दिवाणी वाद आहे. असं कोर्टानं म्हटलं आहे. दिवाणी की फौजदारी हे ठरविण्याचा अधिकार कोर्टाला आहे. तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्या केसच्या संबंधात मी काही बोलणार नाही. पण त्या केसच्या संबंधात संजय राऊत यांना तुरूंगवास भोगावा लागला त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं. असा टोला देखील दिपक केसरकर यांनी लगावला.
Read also
- राहुल गांधींना राष्ट्रवादीची साथ..! भारत जोडो यात्रेत सुळे, जयंत पाटील अन् आव्हांडाची हजेरी
- “तर मग जितेंद्र आव्हाडांना उपोषणाला बसायचं असेल तर खुशाल बसावं”; मनसेने डिवचलं
- “हा माझ्या भावावर अन्याय आहे..;” सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण
- “अफजल खानाची कबर जिजाऊंच्या आदेशाने महाराजांनी बांधली”; जितेंद्र आव्हाड
- दिपाली सय्यद यांच्याविरोधात सेनेचं पुण्यात आंदोलन..! शिंदे गटात गेल्या अन्..;