मुंबई : मागील काही आठवड्यांपूर्वी दादरा नगर हवेली लोकसभा क्षेत्राची पोटनिवडणूक पार पडली. स्वर्गीय खासदार मोहन डेलकर यांचे निधन झाल्याने दादरा नगर हवेली क्षेत्रात निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये मोहन डोलकर यांच्या पत्नी यांचा मोठ्या मतांनी विजय झाला. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.
अंकिता हर्षवर्धन पाटील होणार ठाकरे घराण्याची सून.. 28 डिसेंबरला विवाहसोहळा
या विजयानंतर संजय राऊत यांनी आता दिल्ली दूर नाही म्हणत दिल्लीत देखील शिवसेनेचे वजन वाढणार असा काहीसा संदेश भारतीय जनता पक्षाला दिला होता. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीसोबत देखील संजय राऊतांची बैठक झाली. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
एसटीच्या संपात उभी फूट; आजपासून नवीन पगार वाढ लागू !
लोकसभेला भारतीय जनता पक्षाच्या जीवावर १८ खासदार निवडून आणणाऱ्यांनी, भाजपच्या जीवावर निवडणूक जिंकणाऱ्यांनी देशाच्या राजकारणात जाण्याची स्वप्न आता पाहू नये. अपक्ष असणाऱ्या आणि पळवून आणलेल्या खासदार तुमच्या चिन्हावर निवडून आले का? एका खासदाराच्या जोरावर म्हणतात आम्ही देशाच्या राजकारणात जाणार. त्यासाठी देशभर फिरावं लागतं. ते करण्याची यांची तयारी नाही. आपले लढके नेतुत्व उद्धव ठाकरे मातोश्रीमधून कधी बाहेर पडत नाहीत. गेल्या दोन वर्षात एकदाही उद्धवजी मंत्रालयात गेले नाहीत, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
आमदार संग्राम थोपटेंची जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची हॅट्ट्रीक!
एवढंच नाही तर ममतांना पश्चिम बंगालची वाघीण समजणाऱ्या राऊतांना देखील चंद्रकांत पाटलांनी चांगलेच शाब्दिक टोले हाणले आहेत. ‘खासदार संजय राऊत एक नंबरचे डबलढोलकी नेते आहेत. मुंबईमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या सुरात सुर मिसळतात. ते खुर्ची टिकविण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. आता ममतांच्या युपीएबद्दलच्या वक्तव्यामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी डोळे वटारले असतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read Also :
- महाराष्ट्राने केले उद्योगक्षेत्रात विक्रमी करार; एकाच दिवसात तब्ब्ल ५०५१ कोटींची गुंतवणूक.!
- नगरपंचायतीसाठी पारनेरमध्ये आमदार निलेश लंके विरुद्ध सर्वपक्षीय लढत बघायला मिळणार.!
- ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट – आमदार महेश लांडगे
- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा?”
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी जागांच्या निवडणुकीला स्थगिती, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय