मुंबई : गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या महामारीने चांगलेच थैमान घातले होते. कोरोनाच्या संकटकाळात सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात बघायला मिळाले होते. असं असतानाही महाराष्ट्रात होणारी आर्थिक गुंतवणूक आणि कंपन्यांसोबतचे करार महाराष्ट्र सरकारने थांबवले नव्हते. याच कारणास्तव गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकरणात आघाडीवर आहे.
ओबीसी नेत्यानो आरक्षण टिकवता येत नसेल, राजीनामा देऊन घरी बसा – बाळासाहेब सान
दुबईएक्सपोच्या अभूतपूर्व यशाची कारकीर्द पुढे नेत उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला आहे. देशभरातील विविध १२ कंपन्यांसोबत एका दिवसात सुमारे ५०५१ हजार कोटींचे सामंज्यस करार करण्यात आले आहेत. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले असताना या माध्यमातून ९ हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
अंकिता हर्षवर्धन पाटील होणार ठाकरे घराण्याची सून.. 28 डिसेंबरला विवाहसोहळा
महाराष्ट्रात झालेले गुंतवणूक करार पूर्ण करण्यासाठी उद्योग विभाग कठोर मेहनत घेत आहे. नुकत्याच झालेल्या गुंतवणुकीमुळे राज्याचा सर्वांगीण, औद्योगिक विकास होण्यासाठी मदत मिळणार आहे. काल झालेल्या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती-तंत्रज्ञान, जैव इंधन, इलेकट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे.
एसटीच्या संपात उभी फूट; आजपासून नवीन पगार वाढ लागू !
या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, सोलर एव्हिएशन,पद्मावती पेपर्स, देश ऍग्रो, डी डेकोर या नामांकित कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सामंज्यस्य कराराच्या निमित्ताने राज्यात धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे रोजगाराच्या संधींना बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याबाबत शासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यात सातत्य ठेवण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. करार करण्यात आला त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या समेत अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अलबलगन व विविध कंपन्यांचे उद्योजक उपस्थित होते.
Read Also :
- नगरपंचायतीसाठी पारनेरमध्ये आमदार निलेश लंके विरुद्ध सर्वपक्षीय लढत बघायला मिळणार.!
- ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट – आमदार महेश लांडगे
- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा?”
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी जागांच्या निवडणुकीला स्थगिती, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
- आमदार संग्राम थोपटेंची जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाची हॅट्ट्रीक!