मुंबई : काश्मीर फाईल्स चित्रपटावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार घमासान चालू आहे. राज्यात टँक्स मुक्त करण्याची मागणी भाजप करीत आहे. तर सत्ताधारी पक्ष यावरून भाजपवर जोरदार टीका करत आहे. अशातच आता या चित्रपटावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळत आहे.
दरेकरांना अटक झाली, की ते फरार झालेत? मनिषा कांयदेचा भाजपला तिखट सवाल
शिवसेना खासदार संजय राऊत भाजपला चांगलाचं टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आम्ही ठाकरे चित्रपट बनवला पण टॅक्स फ्री केला नाही. तसेच काश्मीर संबंधी भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे पहिले नेते होते. तेव्हा कुठे होती केंद्र सरकार? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हिंदूंच्या सणाला ठाकरे सरकारचा इतका विरोध का? हिंदूंचा सण जोशात साजरा करणारच, राम कदम
अमरनाथ यात्रा वेळी टेरेरिस्ट धमकी देत होते. तेव्हा कोणाच्या केसाला धक्का लागला तर हज पर्यंत तुमचे विमान उडणार नाही अशी धमकी दिली होती. तेव्हा देखील कुठे होते केंद्र सरकार. काश्मिरी पंडितांच्या मुलांसाठी 5 टक्के राखीव जागा इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना देणारे बाळासाहेब ठाकरे होते, कोणत्या विषयाचे राजकारण कारायाचे भान ठेवले पाहिजे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला हे भान नसेल तर हे गंभीर आहे. असंही संजय राऊत म्हणाले.
काश्मिर फाईल्स चित्रपटाबद्दल बोलतांना अजित पवार म्हणाले की, जर हा चित्रपट टॅक्समुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारनेच घेतला तर संपुर्ण देशाला लागू होईल. हा चित्रपट महाराष्ट्रातच टॅक्स मुक्त केला तर भेदभाव निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्रातचं काय? कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत करा ना टॅक्समुक्त झाला पाहिजे.
दरेकरांना अटक झाली, की ते फरार झालेत? मनिषा कांयदेचा भाजपला तिखट सवाल