मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त हिंदुत्वाचे वातावरण होईल असं जोरदार भाषण केलं. जर मशिदीवरून भोंगे काढले नाही तर त्या समोरच मोठे भोंगे लावून हनुमानचलीसा ऐकवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता. सत्तेत असणाऱ्या शिवसेनवर देखील राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली होती. शिवसेनेने जनमताचा कौल मान्य न करता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना जवळ केलं. यामुळे होत्याचं नव्हतं झालं. शिवसेनेला ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे भर सभांमध्ये वारंवार सांगत होते की मुख्यमंत्री भाजपचा होणार, तेव्हा अडीच वर्षांचं मुख्यमंत्री पद मागणारी शिवसेना झोपली होती काय ? असा संतप्त सवालही राज ठाकरे यांनी शिवसेनेला विचारला. यावर आता शिवसेनेकडून तितकंच आक्रमक उत्तर आलंय.
“काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली”; राज ठाकरेंच्या भाषणांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेवर हल्लाबोल करताना म्हटलं आहे की, एमआयएम भाजपची बी टीम होती हे तर सगळ्यांनाच माहित होतं मात्र आता मनसे भाजपची टीम झाल्याच्या आनंद मला होतोयं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील मनसेवर सडकून टीका केलीय. आज सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी म्हटलं आहे, कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई महापालिका निवडणूक जिंकू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुका शिवसेना ताकदीने लढेल आणि निश्चितपणे जिंकून दाखवेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
“मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल, पण भाजपचं गांडूळ निघालं”;
तुम्ही कितीही कारनामे करा, कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र येऊ द्यात. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मुंबई महापालिकेवरील शिवसेनेचा भगवा झेंडा खाली उतरू देणार नाही. ही निवडणूक आम्ही जिंकणारचं अशी भीष्मप्रतिज्ञा संजय राऊत यांनी घेतली आहे. या कोल्हापूर उत्तरमध्येच कशाला, तर गोव्यात, पाच राज्यांत, पणजी आणि साखळी मतदारसंघात ईडी लावा असा टोलाही राऊतांनी भाजपला हाणला.
दरम्यान, आगामी काळातील मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध भाजप, मनसे असा संघर्ष पेटण्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणामुळे मिळाले आहेत. त्यातचं त्यांची भाजपशी होणारी जवळीक शिवसेनेला खटकणारी आहे. आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनसेचा खरचं भाजपला फायदा होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- राज ठाकरेंना हाफचड्डीपासून ओळखतो, हा त्यांचा सिझनेबल कार्यक्रम
- मनसे भाजपची ‘सी’ टीम झाल्याचा आम्हाला आनंद; आदित्य ठाकरेंची मनसेवर खोचक टीका
- वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं
- काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या
- विरोधकांचा डाव पंतप्रधान इम्रान खाननं उधळून लावला; संसदेत न जाता थेट राष्ट्रपतीची घेतली भेट