मुंबई : पत्राचाळ प्रकरणी इडीच्या न्यायालयीन कोठडीत असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता 5 सप्टेंबर पर्यंत विशेष सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा मुक्काम अजून वाढला आहे. संजय राऊत सध्या ऑर्थर रोडच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांना आज 22 दिवस होतील.
“शेलार, दरेकर स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाही अन्..;” पेडणेकरांचा हल्लाबोल
गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना इडीने अटक केली होती. सुरूवातीला त्यांना 3 त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर इडीने श्रद्धा डेव्हलोपर्सच्या कार्यालयांवरही छापेमारी केली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांसह महत्वाची इडीने जप्त केली होती. याशिवाय राऊत जी मर्सिडिज कार वापरत होते. ती देखील श्रद्धा डेव्हलोपर्सच्याचच मालिकीच असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात काही कागदपत्र इडीने न्यायालयात सादर करणार का ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं, बाबाजी का ठुल्लू,”आदित्य ठाकरेंचा घणाघात
काही दिवसांपुर्वी प्रवीण राऊ यांनी संजय राऊत यांची तुरूंगात जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेनेचे काही आमदारही उपस्थित होते. त्याआधी प्रवीण राऊत यांनी संजय राऊतांना भेटण्यासाठी परवानगी मागितली असता ती तुरूंग प्रशासनानं नाकारली होती. पंरतु त्यांनतर तीन दिवसांचनी संजय राऊतांना भेटीसाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे आज संजय राऊत यांच्यावर सुनावणी करण्यात आली असता त्यांना 5 संप्टेंबर पर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
“देशातील काही महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ
दरम्यान, शिवसेना नेमकी कुणाची ? यासंदर्भात देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर देखील निकाल लागण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिवसेना केंद्रीय निवडणुक आयोगासमोर आपली भूमिका मांडणार आहे. कारण, कागदपत्रे सादर करण्यास निवडणुक आयोगाना दिलेली मुदत उद्या संपत आहे.
Read also
- “शिंदे गट फिंदे गट काही नाही, आम्हीच खरी शिवसेना”; संतोष बंगार यांचा शिवसेनेवर दावा
- फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी अन् कबुली
- “गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार”
- “गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र..;”छगन भुजबळांची प्रतिक्रिया
- “आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद, याचा अर्थ जनता आपल्यासोबत”; उद्धव ठाकरे