नागपुर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीला सत्ताधारी पक्षातील नेत्यांची काही वक्तव्ये दाखवत विरोधकांनी जोरदार बॅनरबाजी केली. त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. यानंतर आता पुढच्या दिवशी काय रणनिती ठरवली जावी, यासाठी आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी विरोधकांची बैठक सुरू आहे.
हेही वाचा…“SIT चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची “दिशा” बदलून थेट दुबई गाठलीय”, शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
विधिमंडळात सरकारला घेरण्यासाठी आणि ११ तारखेला काॅंग्रेसचा हल्लाबोल मोर्चा तर १२ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत युवा संघर्ष यात्रेचा समारोप या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, आणि अनिल देशमुख उपस्थितीत आहेत. तर काॅंग्रेसचेही काही नेते याठिकाणी हजर झाले आहेत.
हेही वाचा…अजित पवार गटाच्या आमदारांना मिळणार मोठं गिप्ट, अधिवेशन संपताच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल, असं म्हणत ठाकरे गटाची धार कमी केली. तर विरोधकांकडून नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बसल्यावर ठाकरे गटाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर सभागृहात शोक प्रस्तावानंतर सभागृहाचं कामकाच उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार, कार्यक्रम जाहीर
हेही वाचा…“नुसतं “भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका” म्हटलं, अन्.., ट्विटरवर चित्रा वाघ आणि सुषमा अंधारे एकमेकांत भिडल्या
हेही वाचा…“देवेंद्र भाऊ सरडा सुद्धा बघून आत्महत्या करेल हो..!” संजय राठोड, नवाब मलिक प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा टोला
हेही वाचा…“विरोधकांच्या घोषणानंतर अखेर कुंभकर्ण सरकार जागे झाले”, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…नवाब मलिक राष्ट्रवादीच्या ‘या’ गटात सहभागी? नवाब मलिक सभागृहात बसल्यानंतर मोठा गोंधळ