मुंबई : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे गटाचे युवा नेते संयुक्त राष्ट्रांकडून हवामान बदल या विषयाच्या हवामान परिषदेच्या २८ व्या बैठकीसाठी दुबईला गेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्याचं हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वीच दिशा सालियन प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरून आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावरून शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा…“त्यामुळेच चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमिका आघाडी सरकारने घेतली”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
आदूची लवकरच एसआयटी चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची “दिशा” बदलून थेट दुबई गाठलीय. दुबईत वातावरण बदलाच्या बैठकीत जाण्यापेक्षा आदूने लोकांचे प्रश्न मांडायला नागपूरला अधिवेशनात उपस्थित राहणं गरजेचं होतं. पण हे सगळं सोडून आदू फिरतीवर आहे. लोकांनी निवडून का दिलयं? याचा ही महाराष्ट्रातील पप्पूला विसर पडलाय बहुतेक असं म्हणत शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
हेही वाचा…“अजित “पर्व” या शब्दाने तुमच्या व्याकरणाची वाट लावली”,अजित दादाच्या आमदाराने आव्हाडांना डिवचलं
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे एसआयटी पथक काम करणार असून दिशा सालियान प्रकरणात ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्याने काही आमदार करत होते. यातच आजपासून नागपुर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पुर्वीच विरोधकांची धार कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागलाय”, राज ठाकरेंनी ट्विट केलं तीन फोटो
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा १४ जून २०२० दिवशी मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच दिवसानंतरच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिचा १९ जुन २०२० रोजी संशयरित्या मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडण्यात आलं होतं.
आदूची लवकरच एसआयटी चौकशी होणार असल्याने आदूने प्रवासाची “दिशा” बदलून थेट दुबई गाठलीय! दुबईत वातावरण बदलाच्या बैठकीत जाण्यापेक्षा आदूने लोकांचे प्रश्न मांडायला नागपूरला अधिवेशनात उपस्थित राहणं गरजेचं होतं!! पण हे सगळं सोडून आदू फिरतीवर…!!! लोकांनी निवडून का दिलयं? याचा ही…
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) December 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाच्या आमदारांना मिळणार मोठं गिप्ट, अधिवेशन संपताच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
हेही वाचा…रायगड लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्ष, कुणाला मिळणार लोकसभेची जागा ?
हेही वाचा…“रेटून खोटे बोलण्यात फडणवीस साहेबांचा हात कुणीच धरू शकत नाही”
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत”, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने आव्हाडांना डिवचलं
हेही वाचा…अधिवेशनाच्या आधीच सरकार विरोधकांची धार कमी करणार ? आदित्य ठाकरेंची ‘या’ प्रकरणात चौकशी होणार