नागपूर : राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांवरून हल्लाबोल केला. सरकारने फक्त ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून उर्वरित महाराष्ट तसाच आहे. अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर देवेंद्र फडणवीस खोटं बोलत असल्याची टिका आता राज्यातील विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
हेही वाचा…केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या ‘या’ १० खासदारांनी दिला राजीनामा, कारण आलं समोर
राज्यात ४० तालुके केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळी घोषित केले आहेत. १२०० मंडळ दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले आहे. जी मदत दुष्काळासाठी तीच दुष्काळसदृशला मिळणार आहे. २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काळात सुद्धा रू. १०,००० कोटींची मदत देण्यात आली आहे. आताही हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. शेतकऱ्यांना संपुर्ण मदत राज्य सरकार करेल. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यावर राष्टवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर देत खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…“उठले की खुपसले नात्यात नाक, हेच काम उरले का राजकारणात ?” रूपाली पाटलांचा सवाल
रेटून खोटे बोलण्यात फडणवीस साहेबांचा हात कुणीच धरू शकत नाही. दुष्काळाच्या दोन्ही शासन निर्णयात (GR) फरक स्पष्ट आहे. चाळीस तालुक्यांच्या पहिल्या GR मध्ये परिच्छेद क्रमांक ४ मध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचा आणि परिच्छेद क्रमांक ५ मध्ये मदत कशी दिली जाईल याचा स्पष्ट उल्लेख आहे, परंतु दुसऱ्या GR मध्ये हे दोन्ही परिच्छेद नाहीत. तरीही दोन्ही शासन निर्णय सारखेच आहेत, असं सांगणारे फडणवीस साहेब तुम्हाला ‘साष्टांग दंडवत’! तुम्ही एवढं धडधडीत खोटं बोलत असतानाही टाळ्या वाजवणाऱ्या आजूबाजूच्या मंत्र्यांबाबत तर न बोललेलंच बरं! दुष्काळात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत भयाण झाली आहे. हातात पैसा नाही, भाजीपाला, दूध घेणंही शेतकरी टाळतायेत. कुटुंबात दोन पोरं शिक्षण घेत असतील तर पैशांअभावी एकाचं शिक्षण बंद करण्याचा विचार शेतकरी करतायेत. ‘जगावं की मरावं’, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय आणि या भयाण परिस्थितीही सरकार मात्र स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. या असंवेदनशील, निकामी आणि गोंधळलेल्या सरकारचा जाहीर निषेध असं रोहित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावी ही कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी ;”
दरम्यान, शब्दांचा छळ करून ट्रीपल इंजिन सरकार शेतकऱ्यांना कसं मूर्ख बनवत आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना दिरंगाई केली होती. नंतर फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. याच तालुक्यांना आता आर्थिक मदत मिळणार आहे. सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यांना मदत देण्याची मागणी आम्ही केल्यानंतर सरकारने घोषणा तर केली पण दुष्काळ सदृश्य परिस्थिती असा शब्दप्रयोग करून महायुती सरकारने 1 हजार 21 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवले. अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
रेटून खोटे बोलण्यात फडणवीस साहेबांचा हात कुणीच धरू शकत नाही. दुष्काळाच्या दोन्ही शासन निर्णयात (GR) फरक स्पष्ट आहे. चाळीस तालुक्यांच्या पहिल्या GR मध्ये परिच्छेद क्रमांक ४ मध्ये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचा आणि परिच्छेद क्रमांक ५ मध्ये मदत कशी दिली जाईल याचा स्पष्ट उल्लेख… pic.twitter.com/BsMjGalK9k
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 7, 2023
For our farmers, first time in Maharashtra…
महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच…
महाराष्ट्र में किसानों के लिए पहली बार..40 तालुके केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळी घोषित केले आहेत.
1200 मंडळ दुष्काळसदृश जाहीर करण्यात आले आहे.
जी मदत दुष्काळासाठी तीच दुष्काळसदृशला मिळणार… pic.twitter.com/ml2uMQZQdi— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत”, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने आव्हाडांना डिवचलं
हेही वाचा…अधिवेशनाच्या आधीच सरकार विरोधकांची धार कमी करणार ? आदित्य ठाकरेंची ‘या’ प्रकरणात चौकशी होणार
हेही वाचा…“त्यामुळेच चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमिका आघाडी सरकारने घेतली”, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अजित “पर्व” या शब्दाने तुमच्या व्याकरणाची वाट लावली”,अजित दादाच्या आमदाराने आव्हाडांना डिवचलं
हेही वाचा…“याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागलाय”, राज ठाकरेंनी ट्विट केलं तीन फोटो