मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्या भूमीवर अनुयायींनी गर्दी केली आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार खासदारांनी यावेळी चैत्यभूमीवर भेट दिली. आताच आता दादर स्थानकाचं नामांतर चैत्यभूमी करावं अशी मागणी काॅंग्रेसच्या ज्येष्ठा नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
हेही वाचा…“विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार”, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं
महाराष्ट्र सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव प्रभादेवी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. यातच दादर स्थानकाचं नामांतर चैत्यभूमी असं करावं, अशी मागणी ही कोट्यवधी भीम अनुयायांची आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाचं नाव हे चैत्यभूमी करण्यात यावं, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.
हेही वाचा…“भुजबळांना लोळवलं नाही तर नाव बदलून ठेवणार”, जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा
दरम्यान, दुर्दैवाने आज आंबेडकरी चळवळीच्या विरोधात असणारा जो प्रवाह आहे – जो समता मानत नाही , जो न्याय मानत नाही, जो बंधुता मानत नाही, जो लोकशाही मानत नाही… त्याच्या हातामध्ये सत्ता आहे..त्यांच्याकडून बाबासाहेबांच्या विचारांचे आणि संविधानाच्या मूळ तत्वांचे रक्षण होईल असे मला वाटत नाही. आणि त्यामुळेच आपण सर्वांनी मिळून एकमेकांच्या सहकार्याने पुन्हा एकदा एक लोकचळवळ उभी करण्याची वेळ आली आहे. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
हेही वाचा…“पक्ष आणि कार्यालय आमचेच आहे”,अधिवेशनापुर्वी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने
हेही वाचा…“ऐनवेळी भाजपने दगाफटका केल्यास..,” शिंदे गटाने नेमले ३९ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक
हेही वाचा…मोठी बातमी…! ललित पाटील पलायन प्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधकांची जोरदार बॅनरबाजी, हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? पाहा व्हिडीओ