नागपूर : शंभर मोर्चे या अधिवेशनात येत आहे. मंत्रालयात रांग लागली आहे. जनतेची कामे होत नाहीत. पण सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन आपली पाठ थोपटून घेत आहे. आजचा चहापान पुढे जातं आले असते. पण सरकारमध्ये संवेदना नाही, त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार घालत आहे, अशी घोषणा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…“भुजबळांना लोळवलं नाही तर नाव बदलून ठेवणार”, जरांगे पाटलांचा भुजबळांना इशारा
उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे. त्याआधी विरोधकांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आरक्षणातील गुंता वाढविण्याचे काम सरकारने केले आहे. नागपूरकर डीसीएम हतबल झाले. आधी एकनाथ शिंदे यांना सांभाळण्याचे काम दिले. नंतर बारामतीकरांना सांभाळण्याचे काम दिले. त्यामुळे ते हतबल झाले आहे. चोर चोर मिळून खाऊ अशी मंत्रिमंडळाची अवस्था आहे. अशी टिकाही त्यांनी केलीय.
हेही वाचा…उद्धव ठाकरे, पटोले आणि बावनकुळेंची एकाच ठिकाणी व्यवस्था, अधिवेशनासाठी जय्यत तयारी
दरम्यान, विदर्भाच्या विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जातात. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. मराठवाड्याचीही तीच अवस्था आहे. महानंदा सारख्या दुध संस्था बंद व्हाव्या असेच सरकारला वाटत आहे. शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळालेली नाही. कापूस वाया जाण्याची शक्यता आहे. कांदा पिकाची अवस्था बिकट आहे. अशातच शासन आपल्या दारी कार्यक्रम घेऊन सरकार नेमकं काय करत आहे. असा सवाल विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पक्ष आणि कार्यालय आमचेच आहे”,अधिवेशनापुर्वी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने
हेही वाचा…“ऐनवेळी भाजपने दगाफटका केल्यास..,” शिंदे गटाने नेमले ३९ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक
हेही वाचा…मोठी बातमी…! ललित पाटील पलायन प्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधकांची जोरदार बॅनरबाजी, हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? पाहा व्हिडीओ
हेही वाचा…“विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार”, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं