नवी दिल्ली : संसदेच हिवाळी अधिवेशन चार दिवसापासून सुरू झालं आहे. सभागृहात विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरतांना दिसत आहे. त्याआधी भाजपच्या दहा खासदारांनी आपले राजीनामे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सोपविले आहेत. त्यामुळे भाजपने मोठी रणनिती आखली आहे का ? असा सवाल यावेळी करण्यात येत आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! ललित पाटील पलायन प्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
अलिकडेच भाजपने राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपने काही केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिली होती. त्यात काही मंत्री विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांना एकाच वेळी दोन्ही सभागृहाचं सदस्यत्व घेता येणार नसल्याने त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा दिले आहेत.
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनापुर्वी विरोधकांची जोरदार बॅनरबाजी, हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? पाहा व्हिडीओ
मध्यप्रदेशातून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, राकेश सिंह, उदय प्रताप आणि रिती पाठक यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तर छत्तीसगडमधून अरूण साव आणि गोमती साई तर राजस्थानमधून राजवर्धनसिंह राठोड, दिया कुमारी, आणि किरोडी लाल मीना या खासदारांनी आपल्या खासदाराकीचा राजीनामा दिला आहे.
हेही वाचा…“विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार”, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं
लोकसभा निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा कमी काळ असल्याने त्याठिकाणी आता खासदारकीसाठी पोटनिवडणुक होणार नाही. या खासदारांपैकी काही केंद्रीय मंत्री आहेत. यापैकी आता कुणाला मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उठले की खुपसले नात्यात नाक, हेच काम उरले का राजकारणात ?” रूपाली पाटलांचा सवाल
हेही वाचा…“दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावी ही कोट्यवधी भीम अनुयायांची मागणी ;”
हेही वाचा…हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार ? विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
हेही वाचा…“पक्ष आणि कार्यालय आमचेच आहे”,अधिवेशनापुर्वी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने
हेही वाचा…“ऐनवेळी भाजपने दगाफटका केल्यास..,” शिंदे गटाने नेमले ३९ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक