पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. तर यातच काल देशात सत्ताधारी आणि विरोधकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवार बंगळुरू येथे विरोधकांच्या बैठकीला तर दिल्लीत अजित पवार सत्ताधारी पक्षांच्या बैठकीला उपस्थित होते. याच वरून आता शिंदे गटातील नेते शाहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर विरोधकांकडून शिंदे गटाला सातत्याने डिवचण्यात येत आहेत. यातच आज विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिंदे गटाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यावरून आमच्या वाट्याला कोणतीही सासू आली नाही. एक दबंग मित्र आमच्या वाट्याला आला आहे. अजित पवार महायुतीत सामील झाल्याने निश्चितपणे आमची राजकीय ताकद वाढली आहे. असं शाहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक, सभागृह नेता, भाजपच्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी धीरज घाटेंवर
दरम्यान, अजित पवार फंड देत नाही म्हणून भाजपसोबत जाणारा शिंदे गट आज अजित पवारांसोबत काम करत आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे, त्यांना माहिती आहे यांनी पक्ष सोडत भाजपला साथ का दिली असे त्यांनी म्हटले आहे. आपला धृतराष्ट्र नाही तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. अशी टिका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पिता-पुत्र राजकारणात…! अजित पवार दिल्लीत सक्रिय, तर पार्थ आणि जय पवारांची राज्याच्या राजकारणात एंट्री
हेही वाचा…“तर त्याला ‘संतोष बांगर अन् मुख्यमंत्री’ जबाबदार,” अयोध्या पौळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी
हेही वाचा…अजित पवारांची बंद दाराआड चर्चा, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले, “राज्यात आता…”
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची विधानसभेत एंट्री, सोमय्यांवर प्रश्न विचारले असता, म्हणाले की, “अशा…,”
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले