मुंबई : राज्यात काही जण सत्तेसाठी डावपेच आखत आहेत. पण अजित पवार यांच्यासोबत आम्ही अडीच वर्ष काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी काही आर्थिक मदत मिळेल अशी आशा आहे. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या आहेत. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर उत्तर दिलं.
हेही वाचा…बैलगाडा शर्यतीबाबत पुनर्विचार याचिकेची चिंता नको! ‘पेटा’च्या भूमिकेनंतर आमदार महेश लांडगे ‘ॲक्टिव्ह’
आज विधानमंडळात उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी राज्यात चांगलं काम करावं अन् जनतेची कामं करावी असं भेटी दरम्यान सांगितलं असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच आमची लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात आहे. लोकशाही, देशप्रेमी पक्ष एकत्र येऊन आमची आघाडी तयार झाली आहे. असंही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा…मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरच्या एक सहीत अडकला, वांद्रे पश्चिम रेक्लमेशनमधील विकास, भाजपच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर
दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत प्रश्न विचारले असता ठाकरेंनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अशा किळसवाण्या प्रकरणावर बोलणार नाही. परंतु राज्यातील महिलांनी यावर चोख उत्तर दिलं असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
हेही वाचा…“रस्त्यावर दिंगबर साधू फिरतात ना, त्यांचे..” किरीट सोमय्या प्रकणावर प्रश्न विचारले असता प्रकाश आंबेडकर संतापले
हेही वाचा…आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक, सभागृह नेता, भाजपच्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी धीरज घाटेंवर
हेही वाचा…भाजपमध्ये मोठे खांदेपालट, धीरज घाटे पुणे शहराध्यक्ष तर शंकर जगतापांकडे पिंपरी चिंचवडची जबाबदारी
हेही वाचा…दिल्लीत दिसली महाराष्ट्राची ताकद, एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना विशेष स्थान